शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रवेश बंद, शासनाचा निर्णय खासगी संस्थांसाठी लाभदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:44 IST

घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- चंद्रमुनी बलखंडेपरभणी : घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या खाजगी अध्यापक विद्यालयांमध्ये अधिकचे विद्यार्थी देण्याचा मार्ग शासनानेच मोकळा करून दिला आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरावर ४ जूनपासून डी.एल.एड. च्या प्रथम वर्षासाठी आॅनलाईन पद्धतीने शासकीय कोट्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशासाठीची २० जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती; परंतु, अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ३० जून पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात जिल्हास्तरावरील शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या शासकीय अध्यापक विद्यालयातही आतापर्यंत डी.एल.एड. साठी प्रवेश देण्यात येत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे एनसीईआरटीच्या पत्रानुसार यावर्षीपासून जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षासाठी प्रवेश बंद करण्यात आले आहेत. परभणी येथील शासकीय अध्यापक विद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशाची क्षमता १०० होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या विद्यालयात फक्त २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०१७-१८ या आर्थिक वर्षात फक्त ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गतवर्षी जिल्ह्यात खाजगी व शासकीय अध्यापक विद्यालयांमध्ये एकूण १ हजार ८०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना फक्त ३०० विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतला. अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय अध्यापक विद्यालयांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे यावर्षीपासून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून घेण्यात आला आहे.तीन विद्यालय बंद; तीनचा शासनाकडे प्रस्तावजिल्ह्यात एकूण २४ अध्यापक विद्यालये आहेत. त्यातील २ अध्यापक विद्यालयाचे प्रवेश बंद आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील तीन अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. शिवाय अन्य तीन अध्यापक विद्यालयांनी प्रवेश बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव एनसीईआरटीकडे पाठविले आहेत.