शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

श्रीमंतांच्या पोरांची नाही तर शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची चिंता करा : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 17:28 IST

सरकारने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा व शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची चिंता करावी

ठळक मुद्दे जिथे इच्छाशक्ती नसते तिथे सर्वेक्षण असतेमराठवाडा वॉटरग्रीड योजना सुरु ठेवावी

परभणी : मुंबईतील श्रीमंतांच्या पोरांची चिंता करून तुम्ही नाईट लाईफ सुरू केली; परंतु, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही़ म्हणून पिकांना पाणी देता येत नाही़ रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून हे शेतकरी पिके जगविण्यासाठी धडपड करतात़ त्यामुळे या सरकारने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करावा व शेतकऱ्यांच्या नाईट लाईफची चिंता करावी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़

परभणी येथे संजिवनी एज्युकेशन सोसायटी, आनंद शिक्षण प्रसारक मंडळ व संजिवनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते़ व्यासपीठावर माजी मंत्री आ़ बबनराव लोणीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, आ़ मेघना बोर्डीकर, माजी आ़ मोहन फड, विजय गव्हाणे, गजाननराव घुगे, भाऊसाहेब देशमुख, संयोजक तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आदीची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील जनता होरपळून निघते़ त्यामुळे या जनतेला दिलासा देण्यासाठी इस्त्रायली तंत्रज्ञानाचा अभ्यास करून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ६४ हजार किमीची धरणे जोडणारी मराठवाडा वॉटरग्रीड योजना कार्यान्वित करण्यात आली़ या योजनेंतर्गत ५ जिल्ह्यांच्या कामांची निविदा प्रक्रियाही झाली होती़ आता हे सरकार सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठवाडा वॉटरग्रीडचे काम थांबवू पाहत आहे, असे झाले तर हा मराठवाड्यावर सर्वात मोठा अन्याय ठरेल़ सरकारला या योजनेमध्ये बदल करायचा असेल तर त्यांनी निश्चित बदल करावा; परंतु, तांत्रिक कारणे सांगून बहाणे करू नये़ जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग असतो आणि जिथे इच्छाशक्ती नसते तिथे सर्वेक्षण असते, असा टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला़

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेतीNightlifeनाईटलाईफState Governmentराज्य सरकार