शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गौरवास्पद ! येलदरीचा जलविद्युत प्रकल्प झाला ५२ वर्षांचा; अखंडितपणे वीजनिर्मिती सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 14:41 IST

Yeldari Dam, Yeldari Hydropower Project : देशाचे तत्कालीन गृह तथा वित्तमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले.

ठळक मुद्देयेलदरी प्रकल्पावर १ जानेवारी १९६९ रोजी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. धरणातील एकूण ९३४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यातून ५९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती

येलदरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावर उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाला १ जानेवारी रोजी ५२ वर्षं पूर्ण होत असून, या प्रकल्पातून आतापर्यंत शेकडो मेगावॉट विजेची निर्मिती झाली आहे. यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अखंडितपणे सुरू असलेल्या या प्रकल्पाचा शुक्रवारी (दि.१) वर्धापनदिन आहे.

देशाचे तत्कालीन गृह तथा वित्तमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले. या धरणाच्या पाण्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तसेच या तिन्ही जिल्ह्यांतील २३२हून अधिक गावे पिण्याचे पाणी येलदरीतून घेतात. याच येलदरी प्रकल्पावर १ जानेवारी १९६९ रोजी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. येलदरी धरणात एकूण ९३४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. त्यापासून ५९ दशलक्ष युनिट इतक्या विजेची निर्मिती होते. हे धरण आतापर्यंत ३० ते ३५ वेळा भरले आहे. त्यातून जवळपास १८ हजार दशलक्ष घन युनिट विजेची निर्मिती झाली आहे.

यावर्षी येलदरी धरणाच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. सात वर्षांनंतर येलदरी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे लागले. या अतिरिक्त पाण्यावर ७२ दिवस अखंडितपणे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्यातून तब्बल १४ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल वीजनिर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीत जमा झाला. गेल्या ५२ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या जलविद्युत प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तरीही उपलब्ध मनुष्यबळावर पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मिती करण्याचे कसब येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवले आहे.

प्रकल्पात तीन विद्युत निर्मिती संचयेलदरी प्रकल्पातील जलविद्युत केंद्रात ७.५ मेगावॉट क्षमतेचे प्रत्येकी तीन विद्युत निर्मिती संच आहेत. या तीन संचांच्या माध्यमातून २२.५० मेगावॉट वीजनिर्मिती एकाचवेळी करण्याची या केंद्राची क्षमता आहे. येलदरी प्रकल्पातून २८ डिसेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. त्यानुसार ३ पैकी २ संचांद्वारे सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून १५ मेगावॉट वीज तयार होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणelectricityवीज