शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

परभणी जि़प़ची सर्वसाधारण सभा बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:57 IST

पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी अधिकारी गेल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेची बुधवारी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा बारगळली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी अधिकारी गेल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेची बुधवारी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा बारगळली आहे़जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या संदर्भातील नोटिसा सर्व सदस्यांना प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आल्या होत्या़ त्यानुसार काही सदस्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सीईओ बी़पी़ पृथ्वीराज व अन्य काही अधिकारी बुधवारी दुपारी २ च्या सुमारास सभागृहात येऊन बसले़ परंतु, नियमित एकही अधिकारी किंवा बहुतांश सभापती उपस्थित नव्हते़यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ़ सुभाष कदम यांनी सभा सुरू करण्याची मागणी केली; परंतु, गणपूर्ती होत नसल्याने ही सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी बहुतांश अधिकारी मुंबईला गेले आहेत़त्यामुळे सभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ ही माहिती अगोदर का दिली नाही ? असा सवाल करून डॉ़ कदम यांनी उपस्थितांना चांगलेच धारेवर धरले़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड यांनीही प्रशासकीय कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली़ त्यानंतर डॉ़ कदम यांची इतर पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली़ आता पुढील आठवड्यात ही सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले़त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विष्णू मांडे यांच्यासह अन्य काही सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले़ त्यांनीही जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त केला़जिल्हा नियोजनच्या निधी वाटपाचेच मुख्य कारणअधिकारी पंचायतराज समितीपुढे साक्ष देण्यासाठी मुंबईला गेल्याचे कारण सांगून सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली असली तरी खरे कारण मात्र जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचे असल्याचे समजते़ जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी त्यांच्या मतदार संघात कोणत्या हेड अंतर्गत किती निधी वाटपाच्या शिफारशी आल्या? याचा जाब विचारला़ सदस्यांनाच अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेतला जात असेल तर तो सहन केला जाणार नाही, असे काही सदस्यांनी सांगितले़ त्यावर पालकमंत्र्यांनी जि़प़ सदस्यांमधील अंतर्गत वाद अगोदर मिटवा़ त्यानंतर निधी वितरणाच्या याद्या द्या, असे सांगितले़ ही यादीच काही सदस्यांपुढे येऊ द्यायची नाही, या हेतुने चर्चाच नको म्हणून तूर्त सर्वसाधारण सभा पुढे ढकलल्याचे समजते़ अधिकारी १९ सप्टेंबरला मुंबईला असणार आहेत? हे माहिती असूनही १९ सप्टेंबर रोजीच सर्वसाधारण सभा का ठेवली? असा सवाल सदस्यांकडून विचारण्यात आला. तसेच या पूर्वी २० जून रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. त्याला २९ सप्टेंबर रोजी २ महिने २९ दिवसांचा कालावधी पूर्ण होतो़ तीन महिन्यांत सभा घेणे बंधनकारक आहे़ या सर्व बाबी ध्यानात घेऊन सभेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी १९ सप्टेंबरच्या सभेचे पत्र काढण्यात आले होते, अशी माहिती सदस्यांनी दिली. विशेष म्हणजे २० जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा अनुपालन अहवाल अद्यापही सदस्यांना मिळाला नाही, असेही जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम, विष्णू मांडे, श्रीनिवास जोगदंड यांनी सांगितले़ त्यामुळे आता पुन्हा एकदा जि़प़ सदस्यांमधील निधी वाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषद