शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणीत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:40 IST

शहरातील धाररोडवरील शासकीय वसतिगृहातील मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी वसतिगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील धाररोडवरील शासकीय वसतिगृहातील मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी वसतिगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शहरातील धाररोडवर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये ६५ मुली निवास करतात. या मुलींना शासनाच्या वतीने सुविधा देण्यात येतात. परंतु, वसतिगृह प्रशासनाच्या वतीने मुलींना स्टेशनरी व भत्ता देण्यात येत नसल्याने आणि फळे दिली जात नसल्यावरुन मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसतिगृहातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन वसतिगृहात येणाºया अडचणी सांगितल्या. तसेच शासनाच्या वतीने देण्यात येणारा भत्ता तात्काळ देण्यात यावा, मेसमधील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी वसतिगृहास भेट देण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात मुक्ता तिडके, रुपाली खिल्लारे, स्वाती देवकर, अफसाना शेख अयुब, वर्षा वाव्हळे, उमा पुंडगे, मीरा आसोरे, पूजा साळवे, वर्षा साबळे, उषा हारकळ, राजश्री टोंपे, साधना वायवळ, नेहा लोणकर, मुक्ता बुधवंत, प्रज्ञा बनसोडे, विद्या जाधव आदींसह ४३ विद्यार्थिनींचा यामध्ये सहभाग होता.महागाई निर्देशांप्रमाणे दरवाढ नाहीया वसतिगृहाला भोजनाचा पुरवठा करणाºया बहुजन हिताय भोजन उत्पादक व पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने जिल्हाधिकाºयांकडे खुलासा दिला आहे. त्यात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाकडून पाच वर्षापूर्वीचे दर मंजूर आहेत. पाच वर्षात भोजनाच्या साहित्याचे दर दुप्पट- तिप्पट वाढले असतानाही जुन्या दराने संस्था पुरवठा करीत आहे. नवीन दरवाढीसाठी संस्थेने दोन वर्षापासून १० वेळा महागाई निर्देशांकाप्रमाणे दरवाढ देण्याची मागणी केली. अथवा भोजन पुरवठा बंद करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. परंतु, या विभागाच्या अधिकाºयांनी नवीन निविदा नसल्यामुळे विद्यार्थी हितासाठी भोजन पुरवठा सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नुकसान सहन करीत संस्था चांगला भोजन पुरवठा करीत आहे. तरीही तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे एकतर नवीन दरवाढ द्यावी, अन्यथा भोजन ठेका बंद करण्याची परवानगी द्यावी.