शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

परभणी, पालम, गंगाखेड, पूर्णा येथे मोर्चा : ‘राष्ट्रवादी’चा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:02 IST

केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन जिल्ह्यात बोंडअळीचे सर्वेक्षण करावे, शेतकºयांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हे मोर्चे काढण्यात आले़ गंगाखेड येथील मोर्चेकºयांनी तहसीलदारांना बोंडअळीग्रस्त कापसाची झाडे भेट दिली़ पूर्णा येथील मोर्चकºयांनी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला़ पालम येथे काढण्यात आलेल्या मोर्चात पदाधिकाºयांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर जोरदार टीका केली़ परभणी येथील मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले़ जिल्ह्यात निघालेल्या या मोर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़परभणी येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़जिंतूर रोडवरील जामकर महाविद्यालयाच्या प्रांगणातून दुपारी १२ वाजता या हल्लाबोल मोर्चास प्रारंभ झाला़ या मोर्चात माजीमंत्री फौजिया खान, अ‍ॅड़बाळासाहेब जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख, विजय जामकर, किरण सोनटक्के, माजी खाग़णेशराव दुधगावकर, अ‍ॅड़विष्णू नवले, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, संतोष बोबडे, जलालोद्दीन काजी, महेबुब अली पाशा, संजय कदम, माणिक जेवणार, अशिष हरकळ, मोहम्मद गौस, संग्राम जामकर, गंगाधर जवंजाळ, इम्रान लाला, सुमंत वाघ, रेखा आवटे, किरण तळेकर, सिद्धार्थ भराडे, रमाकांत कुलकर्णी, राजेंद्र वडकर, सुरेंद्र रोडगे, नंदाताई राठोड, नंदकिशोर शिंदे, शंकर भागवत, रामेश्वर आवरगंड, संगीता पवार, गंगासागर वाळवंटे, दिनेश परसावत, मनोज राऊत, जलील पटेल, अ‍ॅड़अमोल पाथरीकर, अ‍ॅड़रमेश रासवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़पालम- तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी राकाँच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकºयांनी सरकारविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ शहरातील नवा मोंढा भागातील तालुका संपर्क कार्यालयापासून हलगी वाजवित मोर्चाला सुरुवात झाली़ कापसाचे बोंडअळीग्रस्त झाडे हातात घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.गंगाखेड येथे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़ तहसीलदार आसाराम छडीदार यांना शेतकºयांनी सोबत आणलेली कापसाची झाडे भेट देवून निवेदन सादर केले़