शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कँन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST

पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना ...

पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना भेळ, पाणीपूरी, रगडा, दाबेली, वडापाव यासह मिसळ आणि चायनिझ व फास्टफूड खाण्यासाठी अनेक ठिकाणी खवय्यांची दररोज गर्दी होते. हाँटेल तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात वसमत रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिवाजी चौक रस्ता, शनिवार बाजार परिसर यासह जिंतूर रोड आणि अन्य अनेक भागात रस्त्यावर तयार करुन तसेच बनविलेले खाद्यपदार्थ विक्री केले जातात. मात्र, ते बनविताना वापरले जाणारे तेल, भाजी, मसाला यासह अन्य बाबींकडे खाणारे दुर्लक्ष करतात. परिणामी, यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डाँक्टरांकडून दिला जातो.

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

अन्न व औषध प्रशासनाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांची कधी तपासणी झाली, असे दिसून येत नाही. यासह हाँटेल व स्वीट मार्ट आणि फास्टफूड सेंटरवरही कधी तपासणी मोहिम राबविली जात नाही. याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

तर होईल गुन्हा दाखल...

रिफाइंड तेल तसेच शुध्द तेल जरी वापरले जात असले तरी त्याचा एकदा वापर झाल्यावर पुन्हा ते वापरु नये. अशा प्रकारे तेल पुन्हा वापरल्यास नागरिक तसेच ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण

होऊ शकतो. यात दोषी आढळल्यास गुन्हाही दाखल होऊ शकतो.

रस्त्यावर न खाल्लेले बरे

शहरात जवळपास ८ ते १० ठिकाणी खाद्यपदार्थ बनविणारे हातगाडे थांबतात. या ठिकाणाची स्वच्छता तसेच तयार पदार्थ बनविताना कोणती काळजी घेतली जाते. हे तपासलेले बरे. पावसाळ्यात साथीचे आजार तळलेले पदार्थ खाणे तसेच बाहेरील पाणी पिणे यामुळे होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता रस्त्यावर न खाल्लेले बरे.

तेलाचा पुर्नवापर आरोग्याला घातक

घरी खाद्यपदार्थ बनविताना तळलेले तेल पुन्हा शक्यतो महिला वापरत नाहीत. यामागे काही कारणे आहेत. तेलातील पोषण मुल्य एकदा वापर केल्यावर निघून जातात. यामुळे त्याचा पुन्हा वापर केल्यास ते आरोग्यास हितकारक नसते. मात्र, दरवेळी नवीन तेल वापरणे ही बाब आर्थिकदृष्या परवडणारी नसल्याचे सांगून अनेक विक्रेते त्याच तेलाचा पुर्नवापर करतात.

डाँक्टरांचा सल्ला

एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरु नये. त्यातील पोषण मुल्य कमी होते. यातून पचनाच्या तसेच श्वसनाच्या समस्या उदभवू शकतात. व पुन्हा त्याच तेलाचा वापर केल्यास आणि नेहमी बाहेरील खाद्यपदार्थ खाल्यास कँन्सरसारखे आजार होण्याची भिती असते. डाँ. अनिल रामपूरकर, आर्युवेदिक तज्ञ.