शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कँन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST

पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना ...

पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना भेळ, पाणीपूरी, रगडा, दाबेली, वडापाव यासह मिसळ आणि चायनिझ व फास्टफूड खाण्यासाठी अनेक ठिकाणी खवय्यांची दररोज गर्दी होते. हाँटेल तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात वसमत रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिवाजी चौक रस्ता, शनिवार बाजार परिसर यासह जिंतूर रोड आणि अन्य अनेक भागात रस्त्यावर तयार करुन तसेच बनविलेले खाद्यपदार्थ विक्री केले जातात. मात्र, ते बनविताना वापरले जाणारे तेल, भाजी, मसाला यासह अन्य बाबींकडे खाणारे दुर्लक्ष करतात. परिणामी, यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डाँक्टरांकडून दिला जातो.

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

अन्न व औषध प्रशासनाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांची कधी तपासणी झाली, असे दिसून येत नाही. यासह हाँटेल व स्वीट मार्ट आणि फास्टफूड सेंटरवरही कधी तपासणी मोहिम राबविली जात नाही. याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

तर होईल गुन्हा दाखल...

रिफाइंड तेल तसेच शुध्द तेल जरी वापरले जात असले तरी त्याचा एकदा वापर झाल्यावर पुन्हा ते वापरु नये. अशा प्रकारे तेल पुन्हा वापरल्यास नागरिक तसेच ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण

होऊ शकतो. यात दोषी आढळल्यास गुन्हाही दाखल होऊ शकतो.

रस्त्यावर न खाल्लेले बरे

शहरात जवळपास ८ ते १० ठिकाणी खाद्यपदार्थ बनविणारे हातगाडे थांबतात. या ठिकाणाची स्वच्छता तसेच तयार पदार्थ बनविताना कोणती काळजी घेतली जाते. हे तपासलेले बरे. पावसाळ्यात साथीचे आजार तळलेले पदार्थ खाणे तसेच बाहेरील पाणी पिणे यामुळे होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता रस्त्यावर न खाल्लेले बरे.

तेलाचा पुर्नवापर आरोग्याला घातक

घरी खाद्यपदार्थ बनविताना तळलेले तेल पुन्हा शक्यतो महिला वापरत नाहीत. यामागे काही कारणे आहेत. तेलातील पोषण मुल्य एकदा वापर केल्यावर निघून जातात. यामुळे त्याचा पुन्हा वापर केल्यास ते आरोग्यास हितकारक नसते. मात्र, दरवेळी नवीन तेल वापरणे ही बाब आर्थिकदृष्या परवडणारी नसल्याचे सांगून अनेक विक्रेते त्याच तेलाचा पुर्नवापर करतात.

डाँक्टरांचा सल्ला

एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरु नये. त्यातील पोषण मुल्य कमी होते. यातून पचनाच्या तसेच श्वसनाच्या समस्या उदभवू शकतात. व पुन्हा त्याच तेलाचा वापर केल्यास आणि नेहमी बाहेरील खाद्यपदार्थ खाल्यास कँन्सरसारखे आजार होण्याची भिती असते. डाँ. अनिल रामपूरकर, आर्युवेदिक तज्ञ.