शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कँन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST

पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना ...

पावसाळ्याच्या दिवसात व एरव्ही सुध्दा प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. शहरातील तरुण, तरुणी यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना भेळ, पाणीपूरी, रगडा, दाबेली, वडापाव यासह मिसळ आणि चायनिझ व फास्टफूड खाण्यासाठी अनेक ठिकाणी खवय्यांची दररोज गर्दी होते. हाँटेल तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात वसमत रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिवाजी चौक रस्ता, शनिवार बाजार परिसर यासह जिंतूर रोड आणि अन्य अनेक भागात रस्त्यावर तयार करुन तसेच बनविलेले खाद्यपदार्थ विक्री केले जातात. मात्र, ते बनविताना वापरले जाणारे तेल, भाजी, मसाला यासह अन्य बाबींकडे खाणारे दुर्लक्ष करतात. परिणामी, यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डाँक्टरांकडून दिला जातो.

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

अन्न व औषध प्रशासनाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांची कधी तपासणी झाली, असे दिसून येत नाही. यासह हाँटेल व स्वीट मार्ट आणि फास्टफूड सेंटरवरही कधी तपासणी मोहिम राबविली जात नाही. याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

तर होईल गुन्हा दाखल...

रिफाइंड तेल तसेच शुध्द तेल जरी वापरले जात असले तरी त्याचा एकदा वापर झाल्यावर पुन्हा ते वापरु नये. अशा प्रकारे तेल पुन्हा वापरल्यास नागरिक तसेच ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण

होऊ शकतो. यात दोषी आढळल्यास गुन्हाही दाखल होऊ शकतो.

रस्त्यावर न खाल्लेले बरे

शहरात जवळपास ८ ते १० ठिकाणी खाद्यपदार्थ बनविणारे हातगाडे थांबतात. या ठिकाणाची स्वच्छता तसेच तयार पदार्थ बनविताना कोणती काळजी घेतली जाते. हे तपासलेले बरे. पावसाळ्यात साथीचे आजार तळलेले पदार्थ खाणे तसेच बाहेरील पाणी पिणे यामुळे होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता रस्त्यावर न खाल्लेले बरे.

तेलाचा पुर्नवापर आरोग्याला घातक

घरी खाद्यपदार्थ बनविताना तळलेले तेल पुन्हा शक्यतो महिला वापरत नाहीत. यामागे काही कारणे आहेत. तेलातील पोषण मुल्य एकदा वापर केल्यावर निघून जातात. यामुळे त्याचा पुन्हा वापर केल्यास ते आरोग्यास हितकारक नसते. मात्र, दरवेळी नवीन तेल वापरणे ही बाब आर्थिकदृष्या परवडणारी नसल्याचे सांगून अनेक विक्रेते त्याच तेलाचा पुर्नवापर करतात.

डाँक्टरांचा सल्ला

एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरु नये. त्यातील पोषण मुल्य कमी होते. यातून पचनाच्या तसेच श्वसनाच्या समस्या उदभवू शकतात. व पुन्हा त्याच तेलाचा वापर केल्यास आणि नेहमी बाहेरील खाद्यपदार्थ खाल्यास कँन्सरसारखे आजार होण्याची भिती असते. डाँ. अनिल रामपूरकर, आर्युवेदिक तज्ञ.