शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
7
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
8
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
9
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
10
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
12
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
13
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
14
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
15
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
16
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
17
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
18
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
19
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
20
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

परभणी : अन्न सुरक्षा योजनेतील जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६९८ रेशनकार्डधारकांना राज्य शासनाने मंगळवारी घोषित केलेल्या मोफत ...

परभणी : अन्न सुरक्षा योजनेतील जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६९८ रेशनकार्डधारकांना राज्य शासनाने मंगळवारी घोषित केलेल्या मोफत धान्य वितरण निर्णयाचा लाभ होणार आहे.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम दारिद्र्य रेषेखालील तसेच गरजू कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दृष्टीकोनातून राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थ्यांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६८९ लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये बीपीएल कुटुंबातील ७० हजार ९२३ तर अंत्योदय योजनेतील ४४ हजार ९५३ आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या २ लाख ९४ हजार ७६ रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबीयांना ५ किलो मोफत धान्य देण्याची मंगळवारी घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

हाताला काम नसल्याने घरीच बसून आहोत. आता शासनाने ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे काम मिळणेही कमी झाले आहे. त्यामुळे वर्षभर शासनाने हा निर्णय लागू करावा. याचा गरजू लोकांना फायदा होईल.

१५ दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट आले आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. त्यातूनच कोरोनावर मात करता येईल.

सरकारचा निर्णय चांगला आहे. गेल्या वर्षीही जवळपास सहा महिने सरकारने मोफत धान्य दिले होते. आताही १५ दिवसांसाठी का होईना हे धान्य मिळणार आहे. परंतु, धान्याचा दर्जा चांगला राहावा.

तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे.

अनेक गरजू कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाकडे नवे रेशन कार्ड प्राप्त झाले आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे कार्डसाठी अर्ज केल्यास त्यांना सदरील कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.