शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

‘दुधना’च्या पाण्याने भिजली साडेचार हजार हेक्‍टर शेतजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

परभणी : प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले असून, आतापर्यंत ४ हजार ७८४ हेक्टर शेतजमीन कालव्याच्या माध्यमातून ...

परभणी : प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले असून, आतापर्यंत ४ हजार ७८४ हेक्टर शेतजमीन कालव्याच्या माध्यमातून सिंचनाखाली आली आहे. शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणीसाठा उपलब्ध असल्याने कालवा सिंचनाचे क्षेत्र घटले आहे.

शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने निम्न दुधना प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातून आता पूर्ण क्षमतेने पाणी दिले जात आहे. प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांतून यावर्षी रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांसाठी पाण्याचे आवर्तन देण्यात आले. माजलगाव कालवा विभाग क्रमांक १०चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी दोन्ही हंगामांसाठी पाण्याचे नियोजन करून पाणी आवर्तन दिले. या प्रकल्पाच्या कालव्याच्या माध्यमातून २८ हजार ६८४ हेक्‍टर शेतजमीन सिंचनाखाली येते. मात्र, प्रत्यक्षात ४ हजार ७८४ हेक्टर सिंचन झाले आहे. कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्याचा वापर केला नाही. परिणामी सिंचनाचे क्षेत्र घटले आहे.

१५३ किमी लांबीचे कालवे

निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ८४ किमी लांबीचा आहे, तर डावा कालवा ६९ किलोमीटर लांबीचा असून, चाऱ्याच्या माध्यमातून ८१ किमीपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी उजव्या कालव्यातून ६२ किलोमीटरपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. डाव्या कालव्याच्या माध्यमातून एकूण ६९ किमीपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत असल्याने कालव्यांच्या कार्यक्षेत्रात बागायती पिकांचे प्रमाण वाढले आहे.