शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वाळू स्वस्त मिळण्याची सर्वसामान्यांची आशा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

मानवत : वाळू घाट सुरू झाल्यास वाळू कमी दारात मिळेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, ही अशा फोल ...

मानवत : वाळू घाट सुरू झाल्यास वाळू कमी दारात मिळेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, ही अशा फोल ठरली आहे. तालुक्यातील वांगी वाळू घाटावर उपसा करणाऱ्या ठेकेदाराने रॉयल्टीची रक्कम तिपटीने वाढविल्याने याचा परिणाम वाळूच्या किमतीवर झाला आहे. वाहनाचे भाडे धरून ३ ब्रास वाळू २२ हजार रुपयाला मिळत आहे. लिलावानंतर ही वाळू ७ हजार रुपये दराने मिळत असल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील वांगी येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असून, लिलावात हा वाळू घाट पाथरी येथील ठेकेदाराला ३ कोटी २५ लाख रुपयाला सुटला आहे. या ठिकाणाहून फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात ६ हजार रुपये ब्रास वाळू उचलण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाने १८ फेब्रुवारी रोजी संबंधित ठेकेदाराला वाळू घाटाचा ताबा दिला. त्यानंतर २२ फेब्रुवारीपासून या वाळू घाटातून वाळू उपसा करायला सुरुवात झाली आहे. मात्र, या ठेकेदाराने रॉयल्टीची रक्कम गतवर्षीपेक्षा तिपटीने वाढवली आहे. तीन ब्रास वाळू क्षमता असलेल्या छोट्या वाहनासाठी तब्बल १७ हजार रुपये तर पाच ब्रास वाळू क्षमता असलेल्या मोठ्या वाहनासाठी तब्बल २५ हजार रुपये रॉयल्टी संबंधित ठेकेदाराकडून आकारली जात असल्याने याचा परिणाम वाळू दरावर झाला आहे. वाहन भाडे पकडून हे वाहन सर्वसामान्य नागरिकांना ३५ हजार रुपयाला मिळत आहे. म्हणजे ७ ते ८ हजार रुपये प्रति ब्रास वाळूसाठी गोरगरिबांना मोजावे लागत आहेत. यामुळे वाळू घाटाचे लिलाव झाल्यानंतर वाळू स्वस्त मिळेल, अशी आशा गोरगरिबांना होती. मात्र, ती फोल ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. वाळू स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठेकेदाराच्या चढाओढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना

२०१९ मध्ये तीन ब्रास क्षमता असलेल्या वाहनासाठी पाच हजार रुपये तर पाच ब्रास क्षमता असलेल्या वाहनासाठी १० हजार रुपये एवढी रॉयल्टी तत्कालीन ठेकेदाराकडून आकारली गेली होती. मात्र, २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाळू धक्क्याचे लिलाव झाले नव्हते. मात्र, यावर्षी वाळू घाटाचे लिलाव झाले आहेत. २०१९ पेक्षा दुप्पट रक्कम म्हणजेच ३ कोटी २५ लाख रुपयांना हा धक्का लिलावात ठेकेदाराला सुटला आहे. धक्का आपल्यालाच सुटावा या ठेकेदारांच्या स्पर्धेत लिलावाची रक्कम वाढल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही रक्कम वसूल करण्याकरिता रॉयल्टीची रक्कम वाढविली असल्याची माहिती मिळत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. महसूल विभागाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.