शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

वाळू स्वस्त मिळण्याची सर्वसामान्यांची आशा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

मानवत : वाळू घाट सुरू झाल्यास वाळू कमी दारात मिळेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, ही अशा फोल ...

मानवत : वाळू घाट सुरू झाल्यास वाळू कमी दारात मिळेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, ही अशा फोल ठरली आहे. तालुक्यातील वांगी वाळू घाटावर उपसा करणाऱ्या ठेकेदाराने रॉयल्टीची रक्कम तिपटीने वाढविल्याने याचा परिणाम वाळूच्या किमतीवर झाला आहे. वाहनाचे भाडे धरून ३ ब्रास वाळू २२ हजार रुपयाला मिळत आहे. लिलावानंतर ही वाळू ७ हजार रुपये दराने मिळत असल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील वांगी येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असून, लिलावात हा वाळू घाट पाथरी येथील ठेकेदाराला ३ कोटी २५ लाख रुपयाला सुटला आहे. या ठिकाणाहून फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात ६ हजार रुपये ब्रास वाळू उचलण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाने १८ फेब्रुवारी रोजी संबंधित ठेकेदाराला वाळू घाटाचा ताबा दिला. त्यानंतर २२ फेब्रुवारीपासून या वाळू घाटातून वाळू उपसा करायला सुरुवात झाली आहे. मात्र, या ठेकेदाराने रॉयल्टीची रक्कम गतवर्षीपेक्षा तिपटीने वाढवली आहे. तीन ब्रास वाळू क्षमता असलेल्या छोट्या वाहनासाठी तब्बल १७ हजार रुपये तर पाच ब्रास वाळू क्षमता असलेल्या मोठ्या वाहनासाठी तब्बल २५ हजार रुपये रॉयल्टी संबंधित ठेकेदाराकडून आकारली जात असल्याने याचा परिणाम वाळू दरावर झाला आहे. वाहन भाडे पकडून हे वाहन सर्वसामान्य नागरिकांना ३५ हजार रुपयाला मिळत आहे. म्हणजे ७ ते ८ हजार रुपये प्रति ब्रास वाळूसाठी गोरगरिबांना मोजावे लागत आहेत. यामुळे वाळू घाटाचे लिलाव झाल्यानंतर वाळू स्वस्त मिळेल, अशी आशा गोरगरिबांना होती. मात्र, ती फोल ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. वाळू स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ठेकेदाराच्या चढाओढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना

२०१९ मध्ये तीन ब्रास क्षमता असलेल्या वाहनासाठी पाच हजार रुपये तर पाच ब्रास क्षमता असलेल्या वाहनासाठी १० हजार रुपये एवढी रॉयल्टी तत्कालीन ठेकेदाराकडून आकारली गेली होती. मात्र, २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाळू धक्क्याचे लिलाव झाले नव्हते. मात्र, यावर्षी वाळू घाटाचे लिलाव झाले आहेत. २०१९ पेक्षा दुप्पट रक्कम म्हणजेच ३ कोटी २५ लाख रुपयांना हा धक्का लिलावात ठेकेदाराला सुटला आहे. धक्का आपल्यालाच सुटावा या ठेकेदारांच्या स्पर्धेत लिलावाची रक्कम वाढल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही रक्कम वसूल करण्याकरिता रॉयल्टीची रक्कम वाढविली असल्याची माहिती मिळत आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. महसूल विभागाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.