शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:31 IST

तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़कान्हाड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून कान्हड, सिमणगाव, गव्हा, कुपटा, पारडी, कौसडी, मारवाडी, तांदूळवाडी, आडगाव, गुळखंड व हट्टा या गावांना वीज पुरवठा करण्यात येतो़ २२ सप्टेंबर रोजी कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेदं्रातील रोहित्रामध्ये मोठा बिघाड झाल्याने वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांतून वीज गायब झाली आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांना कृषीपंपाद्वारे पाणी देण्यात येत आहे़ त्यामुळे कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार आल्याने वारंवार बिघाड होत आहे़ त्यानंतर अनेक गावांना अंधारात रात्र काढावी लागत आहे़ त्यामुळे महावितरणकडून बोरी येथील ३३ केव्ही उपकेंंद्रातून वीज पुरवठा करण्याच्या हालचाली करण्यात आल्या़ त्यानंतर बोरी येथून कान्हड, सिमणगाव, गव्हा, पार्डी, कौसडी, मारवाडी इ. गावांना वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ मात्र कुपटा, तांदूळवाडी, आडगाव, गुळखंड व हट्टा या पाच गावांचा वीज पुरवठा सोमवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता़ रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांची बत्ती गायब झाली़ त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पिण्याचे पाणी, दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ तसेच पाणीपुरवठा योजना विजेअभावी ठप्प पडली आहे़ वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ कृषीपंपांचा भार वाढत असल्याने कान्हड येथील ३३ केव्ही केंद्रांवर अधिकचा भार पडत आहे़ यामुळे रोहित्रात वारंवार बिघाड होत आहे़ त्यातच शनिवारी रोहित्रात बिघाड झाल्याने अनेक गावांवर विजेचे संकट ओढवले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण