शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...अन पेडगावच्या ओसाड शिवारात धडकला पथकाचा ताफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:52 IST

रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली. 

परभणी :  पेडगाव ग्रामस्थांनी केंद्रीय पथकाचा ताफा अडवून दौरा रद्द का केला, असा जाब विचारल्यानंतर पथकातील अधिकारी नियोजित पेडगाव दौरा करण्यास राजी झाले आणि दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाचा ताफा पेडगाव शिवारातील ओसाड रान आणि दीड दीड फुटाच्या खड्ड्यातून हेलकावे घेत एका शेतात धडकले. अधिकाऱ्यांचा ताफा दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना गराडा घातला. रस्ते, पाणी , मनरेंगाची कामे, प्रशासनाची दिरंगाई, पिकांची अवस्था अशा समस्यांची यादीच पथकासमोर ठेवली. 

परभणी तालुक्यातील हसनापूर- तुळजापूर रस्त्यावरील गणेशराव हरकळ यांच्या शेताची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेतात असलेल्या ७०फूट खोल विहिरीत फुटभरही पाणी नसल्याचे हरकळ यांनी सांगितले. पाणी नसल्याने शेती ओस पडली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमीची कामे नसल्याने शेतकरी कामाच्या शोधात शहरात स्थलांतरित झाले आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी रोहयोची कामे तातडीने सुरू करा,  १०० शेततळे घेण्याचा प्रोग्राम तयार करा अश्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संतोष देशमुख, नागेश चांदणे, श्रीकांत गरड, शरद नंद, अशोक हरकळ, पुरुषोत्तम देशमुख, प्रसाद देशमुख आदींची उपस्थिती होती. अर्ध्या तासाच्या पाहणीनंतर पथक मानवत तालुक्यातील रुढीकडे रवाना झाले.

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकार