शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

तक्रारीनंतर जिल्ह्यात जुन्या दराने खत विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, किटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यातील बाजारपेठेत ...

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, किटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यातील बाजारपेठेत रासायनिक खत कंपन्यांनी वाढीव दराने खत उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे १० टक्के शेतकऱ्यांनी नवीन दरानेच खताची खरेदी केली. त्यानंतर शेतकऱ्यांचा वाढलेला असंतोष पाहून केंद्र सरकारने खताच्या अनुदानात वाढ करून जुन्या दरानेच शेतकऱ्यांना खताची विक्री करण्याचे निर्देश दिले. मात्र परभणी जिल्ह्यातील बाजारपेठेत शिनवारपर्यंत नवीन दरानेच खताची विक्री सुरू होती. त्यामुळे बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने नवीन दराने खताची विक्री केल्यास संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची इशारा देण्यात आला. त्यानंतर शनिवारपासून मात्र जुन्या दराने दुकानदारांनी खताची विक्री सुरू केली आहे. सध्या बाजारपेठेत एमआरपीनुसार खत उपलब्ध झाले असले तरी इफ्को कंपनीच्या १०:२६:२६ या खताची १ हजार १७५ रुपये, १२:३२:१६ खताची १ हजार १८५ रुपये, २०:२०:०:१३ या खताची ९७५ आणि डीएपी १२०० रुपये या दराने उपलब्ध झाले आहे. मात्र खताच्या बॅगवर १ हजार ७५० व १ हजार ९०० रुपये एमआरपी असल्याने काही शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत दुकानदारांनी शनिवारपर्यंत नवीन दरानेच खताची विक्री केली. मात्र रविवारी परभणी येथील नवा मोंढा भागात केलेल्या पाहणीतून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जुन्या दराने दुकानदारांनी खत विक्री केल्याचे दिसून आले.

...तर कायदेशीर कारवाई- आळसे

इफ्को व इतर रासायनिक खत कंपन्यांनी नवीन एमआरपीचा खत जुन्याच किंमतीनुसार विक्री करावा, या संदर्भातील परिपत्रक काढून दुकानदारांना निर्देश दिले आहेत. या उपरही एखाद्या दुकानदाराने नवीन दराने खत विक्री केल्यास त्या दुकानदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बाजारपेठेत मुबलक खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जुन्याच दराने खत खरेदी करावा. एखाद्या दुकानदारासंदर्भात तक्रार असल्या कृषी विभागाकडे तक्रार करावी. खताचा काळा बाजार थांबविण्यासाठी जिल्ह्यात १० पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक संतोष आळसे यांनी दिली.

खताची कृत्रिम टंचाई

परभणी येथील बाजारपेठेत रविवारी केलेल्या पाहणीत काही दुकानदार डीएपी खत नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काही दुकानदारांकडून खताची कृत्रिम टंचाई केली जात असल्याचे दिसून आले.

खत दरवाढीच्या भीतीने आम्ही नवीन दराने खत खरेदी केला आहे. त्यामुळे शासनाने खत खरेदीची आगाऊ रक्कम वापस करावी. प्रति बॅगमागे ७०० ते ८०० रुपये जास्तीचे आकारण्यात आले आहेत. मी ५० बॅग रासायनिक खत खरेदी केले आहे.

- अर्जुन रन्हेर, शेतकरी, डिग्रस.

केंद्र शासनाचा रासायनिक खत कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही परभणी येथील नवा मोंढा भागातील बहुतांश दुकानदारांनी आम्हाला कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत, असे सांगत नवीन दरानेच खताची विक्री केली आहे.

-बाळासाहेब जाधव, शेतकरी, पारवा

खरिपाचे लागवड क्षेत्र

५,२१,०००