शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांनो सावधान; २२ हजार बियाणांच्या शुद्धता तपासणीत तब्बल ४ हजार २५३ नमुने अपात्र

By मारोती जुंबडे | Updated: January 25, 2024 12:39 IST

मागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे.

परभणी : शेतकऱ्यांना पेरणीसाठी शुद्ध व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत वर्षभरात २२ हजार ४२ बियाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २५३ नमुने अपात्र ठरले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, गहू व हरभरा बियाणांचा समावेश आहे.

परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील आठ जिल्ह्यांतून कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदींसह २९ पिकांची बियाणे रब्बी व खरीप हंगामापूर्वी तपासणीसाठी येतात. या प्रयोगशाळेत या बियाणे नमुन्यांचे शुद्धता व उगवण क्षमता तपासणी करण्यात येते. शुद्धतेमध्ये बीज नमुन्याचे आर्द्रता, इतर पिकांची भेसळ, कीडग्रस्त बियाणे तसेच इतर वाणांची भेसळ तपासण्यात येते. कपाशीच्या बीटी वाणांचेसुद्धा तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात येते. परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली यासह आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेता येते. 

परभणी शहरातील पेडगाव रस्त्यावरील बीज परीक्षण केंद्रात २०२२-२३ या वर्षात २२ हजार ४२ बियाणांचे नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील या केंद्राच्या वतीने २१ हजार ११३ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४२५३ बियाणांचे नमुने पेरणीसाठी अपात्र ठरल्याची माहिती परीक्षण प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी यू. जी. शिवणगावकर यांनी दिली.

सर्वाधिक साडेनऊ हजार सोयाबीन बीजाचे परीक्षणमागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शुद्ध प्रतीचे व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडून कार्य केल्या जाते. वर्षभरात २२ हजार ४२ बियाणे नमुने या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आले होते. त्यातील ४२५३ बियाणे हे पेरणीसाठी अपात्र ठरले. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे ९४१६ बियाणे तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे मिळाले. त्यातील ८६४६ बियाणांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वाधिक ३३४० बियाणे हे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घेताना काळजी घ्यावी.

हरभऱ्याचे २७४ नमुने अपात्रखरीप हंगामानंतर येणाऱ्या रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली जाते. नगदी पीक म्हणून सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे पाहत आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला बाजारपेठेत मागणी ही वाढली आहे. परभणी शहरातील बीज परीक्षण केंद्राकडे ४६५९ हरभऱ्याचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यातील ४६५९ बियाणांची तपासणी करण्यात आली. परंतु यातील २७४ नमुने हे नापास झाले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र