शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शेतकऱ्यांनो सावधान; २२ हजार बियाणांच्या शुद्धता तपासणीत तब्बल ४ हजार २५३ नमुने अपात्र

By मारोती जुंबडे | Updated: January 25, 2024 12:39 IST

मागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे.

परभणी : शेतकऱ्यांना पेरणीसाठी शुद्ध व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत वर्षभरात २२ हजार ४२ बियाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २५३ नमुने अपात्र ठरले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, गहू व हरभरा बियाणांचा समावेश आहे.

परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील आठ जिल्ह्यांतून कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदींसह २९ पिकांची बियाणे रब्बी व खरीप हंगामापूर्वी तपासणीसाठी येतात. या प्रयोगशाळेत या बियाणे नमुन्यांचे शुद्धता व उगवण क्षमता तपासणी करण्यात येते. शुद्धतेमध्ये बीज नमुन्याचे आर्द्रता, इतर पिकांची भेसळ, कीडग्रस्त बियाणे तसेच इतर वाणांची भेसळ तपासण्यात येते. कपाशीच्या बीटी वाणांचेसुद्धा तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात येते. परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली यासह आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेता येते. 

परभणी शहरातील पेडगाव रस्त्यावरील बीज परीक्षण केंद्रात २०२२-२३ या वर्षात २२ हजार ४२ बियाणांचे नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील या केंद्राच्या वतीने २१ हजार ११३ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४२५३ बियाणांचे नमुने पेरणीसाठी अपात्र ठरल्याची माहिती परीक्षण प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी यू. जी. शिवणगावकर यांनी दिली.

सर्वाधिक साडेनऊ हजार सोयाबीन बीजाचे परीक्षणमागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शुद्ध प्रतीचे व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडून कार्य केल्या जाते. वर्षभरात २२ हजार ४२ बियाणे नमुने या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आले होते. त्यातील ४२५३ बियाणे हे पेरणीसाठी अपात्र ठरले. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे ९४१६ बियाणे तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे मिळाले. त्यातील ८६४६ बियाणांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वाधिक ३३४० बियाणे हे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घेताना काळजी घ्यावी.

हरभऱ्याचे २७४ नमुने अपात्रखरीप हंगामानंतर येणाऱ्या रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली जाते. नगदी पीक म्हणून सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे पाहत आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला बाजारपेठेत मागणी ही वाढली आहे. परभणी शहरातील बीज परीक्षण केंद्राकडे ४६५९ हरभऱ्याचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यातील ४६५९ बियाणांची तपासणी करण्यात आली. परंतु यातील २७४ नमुने हे नापास झाले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र