शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

शेतकऱ्यांनो सावधान; २२ हजार बियाणांच्या शुद्धता तपासणीत तब्बल ४ हजार २५३ नमुने अपात्र

By मारोती जुंबडे | Updated: January 25, 2024 12:39 IST

मागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे.

परभणी : शेतकऱ्यांना पेरणीसाठी शुद्ध व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत वर्षभरात २२ हजार ४२ बियाणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ हजार २५३ नमुने अपात्र ठरले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, गहू व हरभरा बियाणांचा समावेश आहे.

परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील आठ जिल्ह्यांतून कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदींसह २९ पिकांची बियाणे रब्बी व खरीप हंगामापूर्वी तपासणीसाठी येतात. या प्रयोगशाळेत या बियाणे नमुन्यांचे शुद्धता व उगवण क्षमता तपासणी करण्यात येते. शुद्धतेमध्ये बीज नमुन्याचे आर्द्रता, इतर पिकांची भेसळ, कीडग्रस्त बियाणे तसेच इतर वाणांची भेसळ तपासण्यात येते. कपाशीच्या बीटी वाणांचेसुद्धा तपासणी या प्रयोगशाळेत करण्यात येते. परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली यासह आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेता येते. 

परभणी शहरातील पेडगाव रस्त्यावरील बीज परीक्षण केंद्रात २०२२-२३ या वर्षात २२ हजार ४२ बियाणांचे नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील या केंद्राच्या वतीने २१ हजार ११३ बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४२५३ बियाणांचे नमुने पेरणीसाठी अपात्र ठरल्याची माहिती परीक्षण प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी यू. जी. शिवणगावकर यांनी दिली.

सर्वाधिक साडेनऊ हजार सोयाबीन बीजाचे परीक्षणमागील काही दिवसांपासून बियाण्यांसह खतामध्ये भेसळ करून काही विक्रेते व कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शुद्ध प्रतीचे व सर्वाधिक उगवण शक्तीचे बियाणे मिळावे, यासाठी परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडून कार्य केल्या जाते. वर्षभरात २२ हजार ४२ बियाणे नमुने या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी आले होते. त्यातील ४२५३ बियाणे हे पेरणीसाठी अपात्र ठरले. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे ९४१६ बियाणे तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे मिळाले. त्यातील ८६४६ बियाणांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वाधिक ३३४० बियाणे हे अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घेताना काळजी घ्यावी.

हरभऱ्याचे २७४ नमुने अपात्रखरीप हंगामानंतर येणाऱ्या रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी केली जाते. नगदी पीक म्हणून सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे पाहत आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला बाजारपेठेत मागणी ही वाढली आहे. परभणी शहरातील बीज परीक्षण केंद्राकडे ४६५९ हरभऱ्याचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यातील ४६५९ बियाणांची तपासणी करण्यात आली. परंतु यातील २७४ नमुने हे नापास झाले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र