शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

परभणी जिल्ह्यात अनुदान योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 18:27 IST

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा लाभ घेतला.

ठळक मुद्देशेतकर्‍यांना स्वत:च्या हक्काची कृषी यंत्रसामुग्री, औजारे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्दात हेतूने राज्य शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती- समृद्ध शेतकरी ही योजना सुरू केली.शेती औजाराच्या किंमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व सर्वसाधारण गटातील शेतकर्‍यांना यंत्राच्या किंमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.

- मारोती जुंबडे परभणी : उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे  २ हजार ६६० शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र कृषी विभागाकडूून देण्यात आलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.

शेतकर्‍यांना स्वत:च्या हक्काची कृषी यंत्रसामुग्री, औजारे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्दात हेतूने राज्य शासनाने कृषी विभागामार्फत उन्नत शेती- समृद्ध शेतकरी ही योजना सुरू केली. या योजनेत शेतकर्‍यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे उपलब्ध असलेली औजारे देण्यात येतात. यामध्ये ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्रे, पॉवर ट्रिलर, औजारे आदीवर अनुदान देण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना शेती औजाराच्या किंमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व सर्वसाधारण गटातील शेतकर्‍यांना यंत्राच्या किंमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. ज्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्या शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावयाचा असतो. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने प्राप्त प्रस्तावातून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकर्‍यांची निवड केली जाते. 

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी ही योजना २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी कृषी विभागाला राज्य शासनाने ४ कोटी ९१ लाख ७१ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार २६ एप्रिल २०१७ पासून कृषी विभागाने लाभार्थी शेतकर्‍यांकडून प्रस्ताव मागविले होते. १५ मे २०१७ पर्यंत जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी यंत्र, औजाराच्या अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. प्राप्त अर्जानुसार प्रत्येक लाभार्थ्याचे कृषी विभागाने ट्रॅक्टर व इतर औजारे निहाय तालुकास्तरावर सोडत पद्धतीने ज्येष्ठता सुचीनुसार औजारे खरेदी करण्यासाठी पूर्व संमती देण्यात आली होती. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे आतापर्यंत २ हजार ९०० लाभार्थी शेतकर्‍यांपैकी केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेतील अनुदानाचा लाभ घेतला आहे. यामध्ये शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या ७५ ट्रॅक्टर व १६५ इतर लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या आधारलिंक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

त्यामुळे कृषी विभागाने या योजनेतील अटी व नियम शिथील करून लाभार्थी शेतकर्‍यांना लाभ द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यातून होत आहे. यामध्ये विशेष म्हणजे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर. शिंदे, एच.व्ही. खेडकर यांच्या उपस्थितीत पाथरी तालुक्यात तीन व जिंतूर तालुक्यातील एका लाभार्थ्याला ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले होते. 

कृषी विभागाचे दुसर्‍यांदा आवाहनउन्नत शेती- समृद्ध शेतकरी या योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने २२ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी आपले प्रस्तावही दाखल केले होते; परंतु, केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. त्यामुळे २०१७-१८ या वर्षासाठी कृषी विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने दुसर्‍यांदा आवाहन केले आहे. यामध्ये ज्या शेतकर्‍यांना या योजनेतील अनुदानाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या शेतकर्‍यांनी २२ फेबु्रुवारीपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वी अर्ज सादर केला आहे त्या शेतकर्‍यांनी दुसर्‍यांदा अर्ज सादर करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती- समृद्ध शेतकरी या योजनेचा प्रचार, प्रसार ग्रामीण भागात नसल्याने अनेक शेतकरी  या योजनेपासून वंचित राहत आहेत. 

पावणे पाच कोटी रुपयांचे अनुदान उपलब्धउन्नत शेती-समृद्ध शेतकरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पोहचवा, यासाठी राज्य शासनाने कृषी विभागाकडे जिल्ह्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी ४ कोटी ९१ लाख ७१ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध केले आहे. यातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्रे, पॉवर ड्रिलर चलित यंत्रे, औजारे, कापूस, पºहाटी, ट्रेडर, राईस मील व दालमीलसाठी लागणारे सर्व पॉलिस्टर, क्लिनर कम ग्रेडर, मिनी राईस मील, मिनी दाल मील आदी प्रकारचे यंत्र व सामुग्रीसाठी अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाparabhaniपरभणी