शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

‘कृषी संजीवनी’ कडे शेतकर्‍यांची पाठ; सेलू तालुक्यात शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपये थकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 18:40 IST

कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्‍यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्दे सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्‍यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

सेलू/देवगावफाटा (परभणी): कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्‍यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

सेलू तालुक्यामध्ये दुधना प्रकल्प आहे. शिवाय दुधना नदीपात्रातूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. यामुळे तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये कृषीपंपधारक शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन केले जाते. महावितरणच्या वतीने शेतकर्‍यांना वीजपुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून पुरेशी वीज मिळत नाही. शेतकर्‍यांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला कसरत करावी लागत आहे. तालुक्यामध्ये १० हजार ४०० कृषीपंपधारक आहेत. या कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शेतकर्‍यांकडील थकित बिल वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथकांची स्थापना केली होती. तसेच थकित बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरुन थकबाकीमुक्त होण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना सुरु केली. ही योजना शेतकर्‍यांसाठी चांगली असली तरी सेलू तालुक्यात मात्र म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक शेतकर्‍यांकडे ३० ते ४० हजार रुपये थकित बिल असल्याने एकदम एवढे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत होता. एकूण थकबाकीपैकी पाच टप्प्यापैकी पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार होता. परंतु, अनेक शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. 

डिसेंबर अखेर सेलू तालुक्यातील १० हजार ४०० थकबाकीदार शेतकर्‍यांपैकी केवळ १ हजार ४७५ शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून २६ लाखांचा भरणा करण्यात आला. तर अजूनही जवळपास ८ हजार ९२५ शेतकर्‍यांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. दुसरा हप्ता मार्च २०१८, तिसरा हप्ता जून २०१८, चौथा हप्ता सप्टेंबर २०१८ तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यत आहे. त्यामुळे वीज बिल थकबाकीदार शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

शेतकरी सिंचनामध्ये व्यस्तसेलू तालुक्यामध्ये दुधना नदीपात्रात पाणी सोडले आहे. यापूर्वी डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडले होते. शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देणे सुरु केले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. महावितरणने वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन शेतकर्‍यांना सुरळीत वीज पुरवठा करुन द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

मेश्राम यांनी घेतली बैठकसेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत कृषीपंपाच्या थकबाकीचा आढावा सहाय्यक अभियंता आर.आर.मेश्राम यांनी २५ डिसेंबर रोजी घेतला. या बैठकीमध्ये कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवगावफाटा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत विविध समस्यांची बैठक घेत समस्या सोडविण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना त्यांनी दिल्या. 

खंडीत विजेमुळे शेतकरी त्रस्त

महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली असली तरी कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. सुमारे बारा तासांचे भारनियमन ग्रामीण भागात होत आहे. परिणामी पाणी उपलब्ध असतानाही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या धोरणामुळे शेतकर्‍यांत संताप आहे. त्यामुळेच कृषी संजीवनी योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

३१ डिसेंबरपर्यंत योजना सुरु

कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ३ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. काही शेतकर्‍यांनी दोन हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्या शेतकर्‍यांनी १ हजार रुपये रक्कम भरुन योजनेचा लाभ घ्यावा.- आर. आर. मेश्राम, सहाय्यक अभियंता 

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण