शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

७ वर्षापासून काम रखडले बंधा-याचे काम, शेवटी शेतक-यांनी लोकसहभागातून अडविले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:45 IST

तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे.

पूर्णा : तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बंधा-याचे काम मागील सात वर्षांपासून रखडलेले आहे. 

पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे. बंधा-याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडे केली. परंतु, या मागणीची दखल घेण्यात आली नाही. तीन वर्षानंतर पूर्णा नदीला  मूबलक पाणी आले आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी रबी हंगामाचे नियोजन केले आहे. परंतु, येथील बंधा-याचा काहीही उपयोग होत नाही. 

अर्धवट उभारलेल्या बंधा-यामुळे पाणी वाहून जात आहे. परिसरातील निळा, कंठेश्वर, आजदापूर, महागाव आदी गावातील शेतक-यांनी पुढाकार घेऊन मातीचा बांध टाकण्याचा निर्णय घेतला. आठवडाभरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील माती गोळा करून बांध टाकण्यास सुरुवात केली. गुरुवारी बांधाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे वाहून जाणारे पाणी थांबले असून या पाण्यामुळे परिसरातील ४०० एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत होते. 

७ वर्षापासून काम रखडलेले कंठेश्वर निळा येथे उभारण्यात येणा-या कोल्हापुरी बंधा-याची १ हजार २२२ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परिसरातील शेतकºयांनी नदीपात्रातील उभारलेल्या दरवाजाला माती टाकून पाणी अडविले आहे. दरम्यान, या बंधा-यासोबत मंजुरी मिळालेले राज्यातील इतर बंधा-याचे काम पूर्ण होऊन त्याचा वापरही सुरू झाला आहे. या बंधा-याला मात्र सात वर्षाचा कालावधी उलटला तरी काम रखडलेलेच आहे. त्यामुळे शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी  होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी