शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

७ वर्षापासून काम रखडले बंधा-याचे काम, शेवटी शेतक-यांनी लोकसहभागातून अडविले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:45 IST

तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे.

पूर्णा : तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बंधा-याचे काम मागील सात वर्षांपासून रखडलेले आहे. 

पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे. बंधा-याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडे केली. परंतु, या मागणीची दखल घेण्यात आली नाही. तीन वर्षानंतर पूर्णा नदीला  मूबलक पाणी आले आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी रबी हंगामाचे नियोजन केले आहे. परंतु, येथील बंधा-याचा काहीही उपयोग होत नाही. 

अर्धवट उभारलेल्या बंधा-यामुळे पाणी वाहून जात आहे. परिसरातील निळा, कंठेश्वर, आजदापूर, महागाव आदी गावातील शेतक-यांनी पुढाकार घेऊन मातीचा बांध टाकण्याचा निर्णय घेतला. आठवडाभरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील माती गोळा करून बांध टाकण्यास सुरुवात केली. गुरुवारी बांधाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे वाहून जाणारे पाणी थांबले असून या पाण्यामुळे परिसरातील ४०० एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत होते. 

७ वर्षापासून काम रखडलेले कंठेश्वर निळा येथे उभारण्यात येणा-या कोल्हापुरी बंधा-याची १ हजार २२२ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परिसरातील शेतकºयांनी नदीपात्रातील उभारलेल्या दरवाजाला माती टाकून पाणी अडविले आहे. दरम्यान, या बंधा-यासोबत मंजुरी मिळालेले राज्यातील इतर बंधा-याचे काम पूर्ण होऊन त्याचा वापरही सुरू झाला आहे. या बंधा-याला मात्र सात वर्षाचा कालावधी उलटला तरी काम रखडलेलेच आहे. त्यामुळे शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी  होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी