शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

७ वर्षापासून काम रखडले बंधा-याचे काम, शेवटी शेतक-यांनी लोकसहभागातून अडविले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:45 IST

तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे.

पूर्णा : तालुक्यातील कंठेश्वर निळा येथे मातीचे बांध टाकून शेतक-यांनी कोल्हापुरी बंधा-याचे पाणी अडविले आहे. यामुळे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बंधा-याचे काम मागील सात वर्षांपासून रखडलेले आहे. 

पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, बंधारा अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून पाणी वाहून जात आहे. बंधा-याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडे केली. परंतु, या मागणीची दखल घेण्यात आली नाही. तीन वर्षानंतर पूर्णा नदीला  मूबलक पाणी आले आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी रबी हंगामाचे नियोजन केले आहे. परंतु, येथील बंधा-याचा काहीही उपयोग होत नाही. 

अर्धवट उभारलेल्या बंधा-यामुळे पाणी वाहून जात आहे. परिसरातील निळा, कंठेश्वर, आजदापूर, महागाव आदी गावातील शेतक-यांनी पुढाकार घेऊन मातीचा बांध टाकण्याचा निर्णय घेतला. आठवडाभरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील माती गोळा करून बांध टाकण्यास सुरुवात केली. गुरुवारी बांधाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे वाहून जाणारे पाणी थांबले असून या पाण्यामुळे परिसरातील ४०० एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत होते. 

७ वर्षापासून काम रखडलेले कंठेश्वर निळा येथे उभारण्यात येणा-या कोल्हापुरी बंधा-याची १ हजार २२२ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. परिसरातील शेतकºयांनी नदीपात्रातील उभारलेल्या दरवाजाला माती टाकून पाणी अडविले आहे. दरम्यान, या बंधा-यासोबत मंजुरी मिळालेले राज्यातील इतर बंधा-याचे काम पूर्ण होऊन त्याचा वापरही सुरू झाला आहे. या बंधा-याला मात्र सात वर्षाचा कालावधी उलटला तरी काम रखडलेलेच आहे. त्यामुळे शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी  होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी