शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत आघाडीत बिघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एका जागेवरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची मागणी लावून धरली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज परत घ्यावा, यासाठी आग्रह धरला आहे. दोन्ही नेते आपल्या मागणीवर ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एकसंघ वाटत असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन आरोप - प्रत्यारोप केले गेले, त्यांच्याच सोबतीने जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू व त्यात यश मिळवू, असा ठाम विश्वास खासगी बैठकांमधून नेते मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोन पॅनलच्या सरळ लढतीत किंतू-परंतुने निवडणुकीकडे पाहणाऱ्या विरोधी आघाडीतील उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, फारसे कष्ट न करता जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्याची स्वप्ने संबधितांना पडू लागली आहेत. बुधवार हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी दुपारी ३पर्यंत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्याचा दोन्ही जिल्ह्यातील राजकारणावर भविष्यात परिणाम दिसणार आहे.

देसाई यांच्या बिनविरोध निवडीने संकेत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या पूर्णा गटातून मंगळवारी पांडुरंग लक्ष्मण डाखोरे व अरूण लक्ष्मणराव गुंडाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दुपारी २.५० व २.५५ वाजता परत घेतले. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक तथा भाजपचे नेते बालाजी देसाई हे बिनविरोध निवडले गेले आहेत. देसाई यांनी आ. सुरेश वरपूडकर यांच्या पॅनलकडून १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना त्यांनी मतदारांसोबत शक्ती प्रदर्शनही केले होते. ९ मार्च रोजी त्यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर माजी आ. रापमप्रसाद बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम व अन्य नेत्यांची उपस्थिती होती. देसाई यांच्या बिनविरोध निवडीने आणि बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.