शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत आघाडीत बिघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकींतर्गत १० मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एका जागेवरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची मागणी लावून धरली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज परत घ्यावा, यासाठी आग्रह धरला आहे. दोन्ही नेते आपल्या मागणीवर ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एकसंघ वाटत असलेल्या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन आरोप - प्रत्यारोप केले गेले, त्यांच्याच सोबतीने जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू व त्यात यश मिळवू, असा ठाम विश्वास खासगी बैठकांमधून नेते मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोन पॅनलच्या सरळ लढतीत किंतू-परंतुने निवडणुकीकडे पाहणाऱ्या विरोधी आघाडीतील उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, फारसे कष्ट न करता जिल्हा बॅंकेवर सत्ता मिळविण्याची स्वप्ने संबधितांना पडू लागली आहेत. बुधवार हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी दुपारी ३पर्यंत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्याचा दोन्ही जिल्ह्यातील राजकारणावर भविष्यात परिणाम दिसणार आहे.

देसाई यांच्या बिनविरोध निवडीने संकेत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या पूर्णा गटातून मंगळवारी पांडुरंग लक्ष्मण डाखोरे व अरूण लक्ष्मणराव गुंडाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दुपारी २.५० व २.५५ वाजता परत घेतले. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक तथा भाजपचे नेते बालाजी देसाई हे बिनविरोध निवडले गेले आहेत. देसाई यांनी आ. सुरेश वरपूडकर यांच्या पॅनलकडून १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना त्यांनी मतदारांसोबत शक्ती प्रदर्शनही केले होते. ९ मार्च रोजी त्यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर माजी आ. रापमप्रसाद बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम व अन्य नेत्यांची उपस्थिती होती. देसाई यांच्या बिनविरोध निवडीने आणि बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.