शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:11 IST

मानवत : तालुक्यातील लिलावाद्वारे देण्यात आलेल्या वाळूघाटातून संबंधित ठेकेदार मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा करीत असताना त्यावर नियंत्रण ...

मानवत : तालुक्यातील लिलावाद्वारे देण्यात आलेल्या वाळूघाटातून संबंधित ठेकेदार मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा करीत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात महसूल विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले. तालुक्यातील वांगी येथील वाळूघाटाचा ठेका लिलावाद्वारे तीन कोटी २५ लाख रुपयांना पाथरी येथील ठेकेदाराला मिळाला. या वाळू घाटातून फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत सहा हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने १५ दिवसांच्या आत यासाठीची रक्कम महसूल विभागाकडे भरणे बंधनकारक आहे. असे असताना संबंधित ठेकेदाराने वेळेत ही रक्कम भरली नाही. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा सुरू झालेला नाही. १५ फेब्रुवारी रोजी या ठेकेदाराने ही रक्कम भरली. त्यानंतर महसूल विभागाने तहसील कार्यालयाला गुरुवारी संबंधित ठेकेदाराला वाळूसाठा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे या वाळूघाटातून वाळू उपसा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात तालुक्यात ज्या वाळूघाटांचा लिलाव झाला आहे. तेथे प्रशासनाने मंजुरी दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा केल्याच्या घटना सातत्याने सामोरे येत आहेत. २०१८ मध्ये मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ठेकेदाराला तब्बल दीड कोटी रुपयांचा दंड जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोठावला होता; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पु्न्हा या ठेकेदाराने अवैध वाळूचा उपसा केला. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच महसूल विभागाकडे नसल्याने ठेकेदारांचे फावत आहे.

अटी व नियमांचा नुसताच फार्स

वाळूघाटाचा लिलाव देण्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने काही अटी व नियम घालून दिले जातात. त्यामध्ये वाळू उपशाच्या ठिकाणी ठेकेदराने फलक लावावा. वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच करावे. मनुष्यबळाद्वारेच उत्खनन करावे, वाळू उत्खनन करण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा अनेक अटींचा समावेश आहे; परंतु, या अटींची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्याची यंत्रणाच निर्माण केलेली नाही. परिणामी ठेकेदार मनमानी पद्धतीने वाळू उपशाचे काम करतात.