शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:11 IST

मानवत : तालुक्यातील लिलावाद्वारे देण्यात आलेल्या वाळूघाटातून संबंधित ठेकेदार मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा करीत असताना त्यावर नियंत्रण ...

मानवत : तालुक्यातील लिलावाद्वारे देण्यात आलेल्या वाळूघाटातून संबंधित ठेकेदार मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा करीत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात महसूल विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले. तालुक्यातील वांगी येथील वाळूघाटाचा ठेका लिलावाद्वारे तीन कोटी २५ लाख रुपयांना पाथरी येथील ठेकेदाराला मिळाला. या वाळू घाटातून फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत सहा हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने १५ दिवसांच्या आत यासाठीची रक्कम महसूल विभागाकडे भरणे बंधनकारक आहे. असे असताना संबंधित ठेकेदाराने वेळेत ही रक्कम भरली नाही. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा सुरू झालेला नाही. १५ फेब्रुवारी रोजी या ठेकेदाराने ही रक्कम भरली. त्यानंतर महसूल विभागाने तहसील कार्यालयाला गुरुवारी संबंधित ठेकेदाराला वाळूसाठा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे या वाळूघाटातून वाळू उपसा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात तालुक्यात ज्या वाळूघाटांचा लिलाव झाला आहे. तेथे प्रशासनाने मंजुरी दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा केल्याच्या घटना सातत्याने सामोरे येत आहेत. २०१८ मध्ये मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ठेकेदाराला तब्बल दीड कोटी रुपयांचा दंड जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोठावला होता; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पु्न्हा या ठेकेदाराने अवैध वाळूचा उपसा केला. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच महसूल विभागाकडे नसल्याने ठेकेदारांचे फावत आहे.

अटी व नियमांचा नुसताच फार्स

वाळूघाटाचा लिलाव देण्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने काही अटी व नियम घालून दिले जातात. त्यामध्ये वाळू उपशाच्या ठिकाणी ठेकेदराने फलक लावावा. वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच करावे. मनुष्यबळाद्वारेच उत्खनन करावे, वाळू उत्खनन करण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा अनेक अटींचा समावेश आहे; परंतु, या अटींची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्याची यंत्रणाच निर्माण केलेली नाही. परिणामी ठेकेदार मनमानी पद्धतीने वाळू उपशाचे काम करतात.