शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:11 IST

मानवत : तालुक्यातील लिलावाद्वारे देण्यात आलेल्या वाळूघाटातून संबंधित ठेकेदार मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा करीत असताना त्यावर नियंत्रण ...

मानवत : तालुक्यातील लिलावाद्वारे देण्यात आलेल्या वाळूघाटातून संबंधित ठेकेदार मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा करीत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात महसूल विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले. तालुक्यातील वांगी येथील वाळूघाटाचा ठेका लिलावाद्वारे तीन कोटी २५ लाख रुपयांना पाथरी येथील ठेकेदाराला मिळाला. या वाळू घाटातून फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत सहा हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने १५ दिवसांच्या आत यासाठीची रक्कम महसूल विभागाकडे भरणे बंधनकारक आहे. असे असताना संबंधित ठेकेदाराने वेळेत ही रक्कम भरली नाही. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा सुरू झालेला नाही. १५ फेब्रुवारी रोजी या ठेकेदाराने ही रक्कम भरली. त्यानंतर महसूल विभागाने तहसील कार्यालयाला गुरुवारी संबंधित ठेकेदाराला वाळूसाठा देण्याचे आदेश दिले. त्यामुळे या वाळूघाटातून वाळू उपसा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात तालुक्यात ज्या वाळूघाटांचा लिलाव झाला आहे. तेथे प्रशासनाने मंजुरी दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा केल्याच्या घटना सातत्याने सामोरे येत आहेत. २०१८ मध्ये मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ठेकेदाराला तब्बल दीड कोटी रुपयांचा दंड जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोठावला होता; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पु्न्हा या ठेकेदाराने अवैध वाळूचा उपसा केला. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच महसूल विभागाकडे नसल्याने ठेकेदारांचे फावत आहे.

अटी व नियमांचा नुसताच फार्स

वाळूघाटाचा लिलाव देण्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने काही अटी व नियम घालून दिले जातात. त्यामध्ये वाळू उपशाच्या ठिकाणी ठेकेदराने फलक लावावा. वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच करावे. मनुष्यबळाद्वारेच उत्खनन करावे, वाळू उत्खनन करण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा अनेक अटींचा समावेश आहे; परंतु, या अटींची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्याची यंत्रणाच निर्माण केलेली नाही. परिणामी ठेकेदार मनमानी पद्धतीने वाळू उपशाचे काम करतात.