शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीवरील ५४ लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य ...

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य शासनाने २०१६ पासून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील काही विभागाने या वृक्ष लागवडीचा केवळ सोपस्कार पार पडल्याचे दिसून येते. सेलू येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयाने २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुतर्फा रोपवन करण्यासाठी मोरेगाव ते देगाव फाटा या रस्त्यावर वनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन २ हजार ५०० वृक्षाची लागवड केली. ३१ मार्च २०२० रोजी या झाडाची उंची दोन मीटर झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. विशेष म्हणजे या पाच किमी रस्त्यावर १३ लाख १० हजार ५४० रुपयांचा खर्च वृक्ष लागवडीवर करण्यात आला. मात्र सोमवारी केलेल्या पाहणीत या रस्त्यावर केवळ शंभर झाडे जगताना दिसून आले. तर दुसरीकडे याच विभागाने देऊळगाव गात ते लाडनांद्रा फाटा या पाच किमी रस्त्यावर २०१७ च्या पावसाळ्यात २ हजार ५०० झाडे लावली. या झाडांचे संगोपन केल्यानंतर ३१ मार्च २०२० पर्यंत १ हजार ५५५ झाडे त्यांची उंची दोन मीटर झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु या रस्त्यावर २००हून कमी झाडे दोन मीटरपेक्षा जास्त उंचीची असल्याचे दिसून आले. मात्र या वृक्ष लागवडीच्या संगोपनासाठी १२ लाख ८० हजार ९४८ रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरही सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीवर केलेला खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी होता की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रोपांच्या संगोपनाकडे केले दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेलू ते पाथरी या दहा किमीच्या रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाने २०१६च्या पावसाळ्यात ५००० वृक्षांचे रोपण केले. ३१ मार्च २०१९ रोजी ३ हजार १११ झाडे जगली असून त्यांची उंची ३.५० मीटर एवढी झाल्याचे दाखविण्यात आले. या वृक्ष लागवडीवर सामाजिक वनीकरण विभागाने सर्वाधिक २८ लाख १६ हजार १४६ रुपयांचा खर्च केला असून, सद्यस्थितीत या रस्त्यावरही केवळ २ हजारच्या आसपासच झाडे जगली असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेलू येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील तीन रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी केलेला ५४ लाख ७ हजार ६३४ रुपयांचा खर्च संगोपनाअभावी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.