शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

वृक्ष लागवडीवरील ५४ लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य ...

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य शासनाने २०१६ पासून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील काही विभागाने या वृक्ष लागवडीचा केवळ सोपस्कार पार पडल्याचे दिसून येते. सेलू येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयाने २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुतर्फा रोपवन करण्यासाठी मोरेगाव ते देगाव फाटा या रस्त्यावर वनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन २ हजार ५०० वृक्षाची लागवड केली. ३१ मार्च २०२० रोजी या झाडाची उंची दोन मीटर झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. विशेष म्हणजे या पाच किमी रस्त्यावर १३ लाख १० हजार ५४० रुपयांचा खर्च वृक्ष लागवडीवर करण्यात आला. मात्र सोमवारी केलेल्या पाहणीत या रस्त्यावर केवळ शंभर झाडे जगताना दिसून आले. तर दुसरीकडे याच विभागाने देऊळगाव गात ते लाडनांद्रा फाटा या पाच किमी रस्त्यावर २०१७ च्या पावसाळ्यात २ हजार ५०० झाडे लावली. या झाडांचे संगोपन केल्यानंतर ३१ मार्च २०२० पर्यंत १ हजार ५५५ झाडे त्यांची उंची दोन मीटर झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु या रस्त्यावर २००हून कमी झाडे दोन मीटरपेक्षा जास्त उंचीची असल्याचे दिसून आले. मात्र या वृक्ष लागवडीच्या संगोपनासाठी १२ लाख ८० हजार ९४८ रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरही सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीवर केलेला खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी होता की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रोपांच्या संगोपनाकडे केले दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेलू ते पाथरी या दहा किमीच्या रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाने २०१६च्या पावसाळ्यात ५००० वृक्षांचे रोपण केले. ३१ मार्च २०१९ रोजी ३ हजार १११ झाडे जगली असून त्यांची उंची ३.५० मीटर एवढी झाल्याचे दाखविण्यात आले. या वृक्ष लागवडीवर सामाजिक वनीकरण विभागाने सर्वाधिक २८ लाख १६ हजार १४६ रुपयांचा खर्च केला असून, सद्यस्थितीत या रस्त्यावरही केवळ २ हजारच्या आसपासच झाडे जगली असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेलू येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील तीन रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी केलेला ५४ लाख ७ हजार ६३४ रुपयांचा खर्च संगोपनाअभावी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.