शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीवरील ५४ लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य ...

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य शासनाने २०१६ पासून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील काही विभागाने या वृक्ष लागवडीचा केवळ सोपस्कार पार पडल्याचे दिसून येते. सेलू येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयाने २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुतर्फा रोपवन करण्यासाठी मोरेगाव ते देगाव फाटा या रस्त्यावर वनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन २ हजार ५०० वृक्षाची लागवड केली. ३१ मार्च २०२० रोजी या झाडाची उंची दोन मीटर झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. विशेष म्हणजे या पाच किमी रस्त्यावर १३ लाख १० हजार ५४० रुपयांचा खर्च वृक्ष लागवडीवर करण्यात आला. मात्र सोमवारी केलेल्या पाहणीत या रस्त्यावर केवळ शंभर झाडे जगताना दिसून आले. तर दुसरीकडे याच विभागाने देऊळगाव गात ते लाडनांद्रा फाटा या पाच किमी रस्त्यावर २०१७ च्या पावसाळ्यात २ हजार ५०० झाडे लावली. या झाडांचे संगोपन केल्यानंतर ३१ मार्च २०२० पर्यंत १ हजार ५५५ झाडे त्यांची उंची दोन मीटर झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु या रस्त्यावर २००हून कमी झाडे दोन मीटरपेक्षा जास्त उंचीची असल्याचे दिसून आले. मात्र या वृक्ष लागवडीच्या संगोपनासाठी १२ लाख ८० हजार ९४८ रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरही सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीवर केलेला खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी होता की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रोपांच्या संगोपनाकडे केले दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेलू ते पाथरी या दहा किमीच्या रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाने २०१६च्या पावसाळ्यात ५००० वृक्षांचे रोपण केले. ३१ मार्च २०१९ रोजी ३ हजार १११ झाडे जगली असून त्यांची उंची ३.५० मीटर एवढी झाल्याचे दाखविण्यात आले. या वृक्ष लागवडीवर सामाजिक वनीकरण विभागाने सर्वाधिक २८ लाख १६ हजार १४६ रुपयांचा खर्च केला असून, सद्यस्थितीत या रस्त्यावरही केवळ २ हजारच्या आसपासच झाडे जगली असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेलू येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील तीन रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी केलेला ५४ लाख ७ हजार ६३४ रुपयांचा खर्च संगोपनाअभावी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.