शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मागील आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले आणि जोरदार पाऊस होत आहे. मागील तीन ...

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मागील आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले आणि जोरदार पाऊस होत आहे. मागील तीन दिवसांपासून सलग पाऊस होत असल्याने आता खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील ओढ्या -नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ५६.२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण ३९ महसूल मंडळे असून त्यापैकी १० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पालम मंडळात सर्वाधिक १७४.५ मिमी, चाटोरी मंडळात १२९.५ मिमी, पेठ शिवणी १२८.५, परभणी ६७.३, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ९६.३, पिंपळदरी ६५.३, पूर्णा तालुक्यातील ताडकळस ६६.८, सेलू तालुक्यातील कुपटा ९४.८, सोनपेठ ८३.८ आणि शेळगाव मंडळात ६७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या अतिवृष्टीमुळे गावागावातून वाहणाऱ्या ओढ्यांना पूर आला असून, रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी ५६.२ मिमी पाऊस झाला आहे. त्यात परभणी तालुक्यात ४९, गंगाखेड ६७.८, पाथरी ५२.१, जिंतूर ३५.६, पूर्णा ४७.३, पालम १०६.९, सेलू ६०, सोनपेठ ६१.३ आणि मानवत तालुक्यात ४६.५ मिमी पाऊस झाला