शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर

By राजन मगरुळकर | Updated: July 13, 2022 18:59 IST

परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे.

-राजन मंगरुळकर परभणी : जिल्ह्यात बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पूर्णा आणि पालम तालुक्यातील प्रत्येकी पाच मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवारी ५७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे तीन दरवाजे उघडून ५२ हजार २१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. याशिवाय तालुक्यातील आरखेड जिल्हा परिषद शाळेची भिंत व शिरपूर येथील दोन घरे पडल्याची घटना घडली आहे. सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उक्कडगाव, वडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव या गावातील वाहतूक ठप्प पडली आहे. सेलू तालुक्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडल्याने निम्न दुधना प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले असून, बुधवारी सायंकाळी पाच वाजता २३६७ क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सद्य:स्थितीत दुधना प्रकल्पात ७०.६२ टक्के जिवंत पाणीसाठा निर्माण झाला आहे.

झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंदपरभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे. माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. तसेच पालम तालुक्यातील ३० गावांचा संपर्क तुटला होता. तर गंगाखेड तालुक्यातील दहा गावांचा संपर्क इंद्रायणी नदीच्या पुलावर पाणी आल्याने तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी