शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

हंगाम संपल्यानंतरही पीक कर्ज वाटप निम्म्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST

खरीप हंगामातील या वर्षीची पिके बहरात असतानाही कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे ...

खरीप हंगामातील या वर्षीची पिके बहरात असतानाही कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१- २२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १,२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील खासगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ९४ हजार ६६४ शेतकऱ्यांना ६२८ कोटी ७२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत ५१ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षीचा खरीप हंगाम संपल्यानंतरही शेतकऱ्याला पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकेच्या दारात खेटे मारावे लागत आहेत. याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष, ना प्रशासनाचे! त्यामुळे बळीराजा पीक कर्ज मिळवताना जिल्ह्यात मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीयीकृत पाच बँका २० टक्क्यांच्या खाली

परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ९ सप्टेंबरपर्यंत या बँकांनी २५ हजार ८३४ शेतकऱ्यांना २५३ कोटी १७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ ३२ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ १,६९४ शेतकऱ्यांना २० कोटी ९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकांनी केवळ १९ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २३ हजार ६१५ शेतकऱ्यांना १९८ कोटी ९१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत १०६ पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत ४३ हजार ५२१ शेतकऱ्यांना १५६ कोटी २८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत कर्ज वाटपाचे १०९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत ५ बँका २० टक्क्यांच्या खाली असल्याचे दिसून येत आहे.

संघटना, पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प

यावर्षीचा खरीप हंगाम संपल्यानंतरही केवळ ९४ हजार ६६४ शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांनी ६२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. विशेष म्हणजे दीड लाखांहून अधिक शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांकडून पुनर्गठन, कर्जमाफी, सिबिल यांसह अनेक कारणे देऊन पीक कर्ज नाकारत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत, असे असतानाही जिल्ह्यातील संघटना, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र आवाज उठवताना दिसत नाहीत.