शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

३० वर्षांनंतरही मिळेना भूखंडाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST

नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी परभणी : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस व सोयाबीचे मोठे ...

नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी

परभणी : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस व सोयाबीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यातून होत आहे.

प्रचार, प्रसाराला दिली बगल

परभणी : मुद्रा योजनेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनाकडून ठोस निधीही उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून बेरोजगारांचे मेळावे घेेणे, जाहिरातीच्या माध्यमातून योजनेचा प्रचार करणे अपेक्षित आहे. मात्र, त्याला बगल दिली जात आहे.

नियंत्रण नसल्याने निकृष्ट काम

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने बांधलेल्या दोन्ही इमारतींचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. दीड-दोन वर्षांत या इमारतीची दुरवस्था झाल्याने कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे काम झाले आहे. मात्र, एका वर्षात फरशा उखडणे, स्लॅब उखडण्याच्या घटना घडल्या आहेत.

वृक्ष संवर्धनासाठी पाणी नियोजन गरजेचे

परभणी : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र, या वृक्षांना पाणी मिळत नसल्याने ही रोपे जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वन विभागाने वृक्ष संवर्धनासाठी शाश्वत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, तरच वृक्ष लागवड मोहिमेचा खरा अर्थ सार्थ होण्यास मदत होईल.

एका खाटेवर दोन रुग्ण

परभणी : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय, ऑर्थो विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डांमध्ये एका खाटावर दोन रुग्ण ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर, काही वार्डांमध्ये साफसफाईचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

अकरा कलमी कार्यक्रमाला दिला खो

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्ट्र योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला. मात्र, कामाची मुदत संपूनही जिल्ह्यातील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.

लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी

परभणी : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना तत्काळ राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत तत्काळ कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

वाडीपाटी ते गाव रस्त्याची दुरवस्था

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातील वाडी पाटी ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.