शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी पाथरी तालुक्यातील १५ गावांत ग्रामदक्षता समित्यांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:10 IST

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी तालुक्यातील १५ वाळू घाटांच्या गावांमध्ये ग्रामदक्षता समित्यांची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे़

पाथरी ( परभणी ) : अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी तालुक्यातील १५ वाळू घाटांच्या गावांमध्ये ग्रामदक्षता समित्यांची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे़

पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रामध्ये २२ वाळूचे घाट आहेत. वाळू घाटाचा लिलाव होण्यापूर्वी तसेच लिलाव झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करुन वाहतूक केली जात असल्याचा प्रकार तालुक्यात घडत आहे़ त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल वाया जात आहे़ राज्य शासनाने अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे़ पाथरी तालुक्यातही उपजिल्हाधिकारी सी.एस.कोकणी यांच्या आदेशाद्वारे समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़ यामध्ये पाटोदा, मरडसगाव, गोपेगाव, मसला खु., नाथरा, मंजरथ, निवळी, रामपुरी खु., गुंज खु., गौंडगाव, उमरी, अंधापुरी, मुद्गल आणि विटा या गावांचा समावेश आहे. अवैध वाळू रोखण्यासाठी गाव पातळीवर समित्या नेमल्या आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. समित्यांनी जबाबदारी यशस्वी पार पाडली तर अवैध वाळू उपशावर अंकुश बसेल, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी कोकणी यांनी दिली़

समितीला धरले जाणार जबाबदारपाथरी तालुक्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत़ यामध्ये गावचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल यांचा समितीमध्ये समावेश आहे. या समितीला वाळू उत्खनन व उपशावर निर्बंध घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास या समितीलाच जबाबदार धरण्यात येणार आहे.