शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बंधाऱ्याचे दरवाजे गायब ; तरीही पूर्ण क्षमतेने सिंचनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाजे ५ वर्षांपूर्वी पाण्याने वाहून गेले असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मात्र ...

परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाजे ५ वर्षांपूर्वी पाण्याने वाहून गेले असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मात्र या बंधाऱ्यातील पाण्यातून पूर्ण क्षमतेने सिंचन होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून मुळी शिवारात गोदावरी नदीवर २०११ मध्ये निम्न पातळी बंधारा उभारण्यात आला होता. यावेळी या बंधाऱ्याला प्रायोगिक तत्वावर २० स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले होते. या दरवाजे काम व्यवस्थित झाले नसल्याने २०१२ मध्ये ते निखळून पडले. त्यानंतर दरवाज्यांची दुरुस्ती करून ते पुन्हा बसविण्यात आले. सप्टेंबर २०१६ पर्यंत बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आले. परंतु, नंतर गोदावरी नदीला पूर आल्याने पुराच्या पाण्यात २० पैकी १६ दरवाजे निखळले. तेव्हापासून अद्यापपर्यंत या दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बंधाऱ्याचे वीसही दरवाजे बसविल्यानंतर ११.३५ दलघमी पाणीसाठा होऊन गंगाखेड तालुक्यातील ८ व सोनपेठ तालुक्यातील ३ अशा एकूण ११ गाव शिवारातील १ हजार ७०५ हेक्टर जमिनीचे सिंचन क्षमता निर्माण झाली असती. परंतु, बंधाऱ्याचे दरवाजे निखळले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. विशेष म्हणजे या बंधाऱ्याच्या कामानंतर शिल्लक असलेला मलबा नदीपात्रातून काढलेला नाही. त्यामुळे हे नदीपात्र उथळ झालेले आहे. परिणामी पाणी थांबण्याची सुतराम शक्यता नाही. बंधाऱ्याच्या परीक्षेत्रात जे काही थोडेफार पाणी थांबले आहे. ते नदीपात्रातील वाळूचा अवैध रित्या उपसा केला गेल्याने मोठ्या प्रमाणात पात्रात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी थांबले आहे. ही सद्य:स्थिती असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बाबीचा विचार न करता केवळ कागदी घोडे नाचवून पूर्ण क्षमतेने म्हणजेच ११.३५ दलघमी पाणीसाठा येथे होतो व १७०५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा वार्षिक अहवाल राज्य विधी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला आहे. त्यामुळे महामंडळाचे अधिकारी केवळ कागदावरच सिंचन करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.

मुळी निम्न पातळी बंधाऱ्याचे निकाली झालेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी उभ्या उचल पद्धतीने व्हर्टिकल दरवाजे बसविण्याची मागणी वारंवार केली. मात्र याचा फायदा झाला नाही. नदीपात्राचे खोलीकरणही केले गेले नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना सध्या फारसा फायदा होत नाही.

रमेश पवार, शेतकरी, खळी

जुनाच अहवाल नव्याने सादर

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच पद्धतीचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यावेळीही पूर्ण क्षमतेने सिंचन झाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात अशी स्थिती नव्हती. यावर्षी देखील जुन्याच अहवालाची पाने नव्या तारखेत जोडून ती सभागृहाला सादर करण्यात आली आहेत.