शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

बंधाऱ्याचे दरवाजे गायब ; तरीही पूर्ण क्षमतेने सिंचनाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाजे ५ वर्षांपूर्वी पाण्याने वाहून गेले असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मात्र ...

परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे दरवाजे ५ वर्षांपूर्वी पाण्याने वाहून गेले असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मात्र या बंधाऱ्यातील पाण्यातून पूर्ण क्षमतेने सिंचन होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून मुळी शिवारात गोदावरी नदीवर २०११ मध्ये निम्न पातळी बंधारा उभारण्यात आला होता. यावेळी या बंधाऱ्याला प्रायोगिक तत्वावर २० स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले होते. या दरवाजे काम व्यवस्थित झाले नसल्याने २०१२ मध्ये ते निखळून पडले. त्यानंतर दरवाज्यांची दुरुस्ती करून ते पुन्हा बसविण्यात आले. सप्टेंबर २०१६ पर्यंत बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आले. परंतु, नंतर गोदावरी नदीला पूर आल्याने पुराच्या पाण्यात २० पैकी १६ दरवाजे निखळले. तेव्हापासून अद्यापपर्यंत या दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बंधाऱ्याचे वीसही दरवाजे बसविल्यानंतर ११.३५ दलघमी पाणीसाठा होऊन गंगाखेड तालुक्यातील ८ व सोनपेठ तालुक्यातील ३ अशा एकूण ११ गाव शिवारातील १ हजार ७०५ हेक्टर जमिनीचे सिंचन क्षमता निर्माण झाली असती. परंतु, बंधाऱ्याचे दरवाजे निखळले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. विशेष म्हणजे या बंधाऱ्याच्या कामानंतर शिल्लक असलेला मलबा नदीपात्रातून काढलेला नाही. त्यामुळे हे नदीपात्र उथळ झालेले आहे. परिणामी पाणी थांबण्याची सुतराम शक्यता नाही. बंधाऱ्याच्या परीक्षेत्रात जे काही थोडेफार पाणी थांबले आहे. ते नदीपात्रातील वाळूचा अवैध रित्या उपसा केला गेल्याने मोठ्या प्रमाणात पात्रात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी थांबले आहे. ही सद्य:स्थिती असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या बाबीचा विचार न करता केवळ कागदी घोडे नाचवून पूर्ण क्षमतेने म्हणजेच ११.३५ दलघमी पाणीसाठा येथे होतो व १७०५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा वार्षिक अहवाल राज्य विधी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला आहे. त्यामुळे महामंडळाचे अधिकारी केवळ कागदावरच सिंचन करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.

मुळी निम्न पातळी बंधाऱ्याचे निकाली झालेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी उभ्या उचल पद्धतीने व्हर्टिकल दरवाजे बसविण्याची मागणी वारंवार केली. मात्र याचा फायदा झाला नाही. नदीपात्राचे खोलीकरणही केले गेले नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना सध्या फारसा फायदा होत नाही.

रमेश पवार, शेतकरी, खळी

जुनाच अहवाल नव्याने सादर

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच पद्धतीचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यावेळीही पूर्ण क्षमतेने सिंचन झाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात अशी स्थिती नव्हती. यावर्षी देखील जुन्याच अहवालाची पाने नव्या तारखेत जोडून ती सभागृहाला सादर करण्यात आली आहेत.