शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

स्थायीसह ७ विषय समित्यांच्या सभापतींची निवड बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळेना महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड करण्यापूर्वी सदस्यांची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन ...

सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळेना

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड करण्यापूर्वी सदस्यांची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करून सभागृहातील संख्याबळानुसार विविध पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्याची निवड करून त्यांची नावे सर्वसाधारण सभेत ठेवली जातात. या सभेत संबंधित नावाला मंजुरी दिल्यानंतर ही यादी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येते. त्यानंतर विभागीय आयुक्त सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतात. त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी जिल्हाधिकारी असतात. ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी मनपाची सर्वसाधारण सभाच गेल्या ६ महिन्यांत झालेली नाही. त्यामुळे सदस्यांची निवडही झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात मनपाची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली होती. त्यावेळी स्थायीचे सभापती पद रिक्त असल्याने मनपा आयुक्तांनीच अर्थसंकल्प सादर केला होता.

विरोधी पक्षच अस्तित्वात नाही

महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे; पण ते नावालाच आहे. कारण या पक्षाने एकीकडे विरोधी पक्ष म्हणून मनपाच्या प्रशासकीय सुविधा मिळविल्या आहेत, तर दुसरीकडे सभापती पद मिळवत सत्तेचा लाभही घेतला आहे. त्यामुळे या पक्षाची मनपातील भूमिका चकित करणारी आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या पक्षांना यात चुकीचं आहे, असं काहीही वाटत नाही. त्यामुळे तेही चुप्पी साधून आहेत.