शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

परभणी जिल्हा कचेरीतील ई-आॅफीस २२ दिवसांनी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:10 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तब्बल २२ दिवसानंतर शनिवारी ई- आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली; परंतु, मध्यंतरीच्या २२ दिवसांच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तब्बल २२ दिवसानंतर शनिवारी ई- आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली; परंतु, मध्यंतरीच्या २२ दिवसांच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागली.कामात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्याच्या उद्देशाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच सहा महिन्यांपूर्वी ई-आॅफीस ही प्रणाली सुरु करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आॅनलाईन सर्व्हरवर आधारलेली ही प्रक्रिया असून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्यात प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस झाले. या कार्यालयात येणाºया प्रत्येक कागदाचे स्कॅनिंग करुन आॅनलाईन पद्धतीनेच त्यावर निर्णय घेण्यात आले. अतिशय परिणामकारक असलेली ही पद्धती सुरु झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजालाही गती मिळाली. ई-आॅफीस या प्रणालीअंतर्गत सर्व कामकाज आॅनलाईन करण्यात आले.विशेष म्हणजे एखाद्या फाईलची सुरुवात ते फाईलीवरील निर्णयापर्यंतचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन होत असल्याने ही फाईल नेमकी कुठे ठेवली आहे, त्यामधील काही अडचणी या बाबी एका क्लीकवर निदर्शनास येऊन त्यावर निर्णय घेणे सोपे झाले. सहा महिन्यांपासून कार्यरत असलेली ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता अवगत झाली होती. कामकाजही सुरळीत चालले होते.२२ दिवसांपूर्वी मंत्रालयस्तरावर या प्रक्रियेच्या सर्व्हरमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात वापरली जाणाारी ई-आॅफीस ही प्रक्रिया ठप्प पडली. मागील २२ दिवसांपासून ई-आॅफीसमध्ये कामकाज करताना अडचणी येत असल्याने अधिकारी- कर्मचारी त्रस्त होते. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच एनआयसीच्या अधिकाºयांनी मुंबई येथे सातत्याने पाठपुरावा सुरु केला. मात्र मंत्रालयस्तरावरच या प्रणालीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. मंत्रालयातील तांत्रिक अधिकाºयांची टीम सातत्याने सर्व्हर दुरुस्तीचे काम करत आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे एक-दोन दिवसांत ही यंत्रणा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती.जिल्हाधिकारी कार्यालयात वापरल्या जाणाºया ई-आॅफीस प्रणालीमध्ये रिसिप्टची फाईल तयार होत होती; परंतु, एका लॉगीनमधून दुसºया लॉगीनमध्ये फाईल ट्रान्सफर होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीचे स्कॅनिंग व पहिल्यास्तरावरील प्रक्रिया पूर्ण होत होती; परंतु, त्यापुढे ही फाईल पाठविताना अडचणी निर्माण झाल्या. ई- आॅफीस प्रणालीमध्ये फाईल सेव्ह होत असल्याने या काळात ई-आॅफीस पद्धतीनेच कामकाज करण्यात आले. आॅफलाईन कामकाज झाले नाही. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ववत झाली. एका लॉगीनमधून दुसºया लॉगीनमध्ये फाईलही ट्रान्सफर झाली. त्यामुळे २२ दिवसांपासून ठप्प पडलेली प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीसचे कामकाज सुरळीत सुरु होईल. मात्र २२ दिवसांच्या कालावधीत ज्या फाईल ई-आॅफीसमधून अपलोड केल्या होत्या, त्या शनिवारी सायंकाळी आढळल्या नाहीत. त्यामुळे या फाईलची प्रतीक्षा प्रशासनाला लागली आहे. ई-आॅफीसमध्ये केलेले सर्व कामकाज हे महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हरवर असते. त्यामध्ये प्रत्येकवेळी बॅकअप घेतलेला असतो. त्यामुळे ज्या फाईल अपलोड झाल्या आहेत, त्याचा बॅकअप उपलब्ध होणार आहे; परंतु, सध्या तरी जुन्या फाईलचा बॅकअप प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला राज्यस्तरावरुन एनआयसी केंद्राशी पाठपुरावा करावा लागणार आहे. २२ दिवसानंतर शनिवारी सायंकाळी ई- आॅफीस प्रक्रिया पूर्ववत झाल्याने अधिकारी- कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सर्वच जिल्ह्यांमध्ये होता तांत्रिक बिघाडपरभणी जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ई- आॅफीस प्रणालीतून केले जाते. मंत्रालयस्तरावर या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणीसह इतर जिल्ह्यातीलही कामकाज ठप्प झाले होते. शनिवारी सायंकाळी या प्रणालीत फाईल अपलोड केली असता, ती व्यवस्थित अपलोड झाली. दुसºया लॉगीनमध्येही ही फाईल ट्रान्सफर झाल्याने ई-आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली असल्याची माहिती एनआयसीचे सुनील पोटेकर यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेट