शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

अल्प प्रतिसाद असल्याचे कारण देत जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:06 IST

 घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- चंद्रमुनी बलखंडे

परभणी :  घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या खाजगी अध्यापक विद्यालयांमध्ये अधिकचे विद्यार्थी देण्याचा मार्ग शासनानेच मोकळा करून दिला आहे. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरावर ४ जूनपासून डी.एल.एड. च्या प्रथम वर्षासाठी आॅनलाईन पद्धतीने शासकीय कोट्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशासाठीची २० जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती; परंतु, अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ३० जून पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात जिल्हास्तरावरील शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या शासकीय अध्यापक विद्यालयातही आतापर्यंत डी.एल.एड. साठी प्रवेश देण्यात येत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे एनसीईआरटीच्या पत्रानुसार यावर्षीपासून जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षासाठी प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

परभणी येथील शासकीय अध्यापक विद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशाची  क्षमता १०० होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या विद्यालयात फक्त २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०१७-१८ या आर्थिक वर्षात फक्त ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गतवर्षी जिल्ह्यात खाजगी व शासकीय अध्यापक विद्यालयांमध्ये एकूण १ हजार ८०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना फक्त ३०० विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतला. अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय अध्यापक विद्यालयांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे यावर्षीपासून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून घेण्यात आला आहे.  

तीन विद्यालय बंद; तीनचा शासनाकडे प्रस्तावजिल्ह्यात एकूण २४ अध्यापक विद्यालये आहेत. त्यातील २ अध्यापक विद्यालयाचे प्रवेश बंद आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील तीन अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. शिवाय अन्य तीन अध्यापक विद्यालयांनी प्रवेश बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव एनसीईआरटीकडे पाठविले आहेत. 

टॅग्स :Teacherशिक्षकcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकार