शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

भिक नको, घेऊ घामाचे दाम; पिकविमा, एफआरपीसाठी स्वाभिमानीचे उपोषण

By मारोती जुंबडे | Updated: April 10, 2023 17:36 IST

शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

परभणी: जिल्हा व परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला. मात्र या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर १४ दिवसात देणे बंधनकारक आहे, असे असतानाही बहुतांश कारखान्यांनी ही पूर्ण रक्कम दिलेली नाही. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १० एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी देण्यात आलेल्या भिक नको,घेऊ घामाचे दाम, शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

जिल्हा व परिसरातील साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेलेला आहे. या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम कारखाना बंद झाल्यावर १४ दिवसात देणे असा कायदा आहे. मात्र बऱ्याच कारखान्यांनी ही पूर्ण रक्कम देलेली नाही, २०२१ व २०२२ चा पिक विमा रक्कम देण्यास विमा कंपन्या चालढकल करीत आहेत, ती रक्कम देण्यात यावी, पावसाळ्यात ज्यावेळी अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतीपिकांना अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र आजही निकषापेक्षा तीनपट रक्कमेपासून वंचित आहेत. ती रक्कम तत्काळ देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १० एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणात किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाभाऊ लोडे, पंडित भोसले, पी. टी. निर्वळ, मुनीर पटेल, बालकिशन चव्हाण, रामेश्वर अवरगंड, प्रसाद गरुड, बाळासाहेब घाटोळ, उध्दव जंवजाळ, माऊली शिंदे, शेख सलीम, काशिनाथ शिंदे, निवत्ती गरुड, विकास भोपळे, शेख चाँद, हनुमान आमले, गोविंद आमले, राजपाल देशमुख, राम चोकट, चंद्रकांत लोखंडे, माऊली लोडे, मोकिंद वावरे, अंकुश शिंदे, अंगद गरुड यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी