शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

परभणीत फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करून परभणीत फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत का? असा संतप्त ...

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करून परभणीत फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत का? असा संतप्त सवाल भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी मुंबई येथील आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. ३१ जुलैरोजी दुपारनंतर त्या मावळते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून पदभार स्वीकारणार होत्या. तत्पूर्वीच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आंचल यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले आहे. ३० जुलैरोजी आंचल यांची नियुक्ती रद्द केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत बोलताना जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्याला कडक शिस्तीचे अधिकारी कोणाला नको आहेत? की महाविकास आघाडी सरकारलाच चांगले अधिकारी नकोत? त्यांना फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत? महिला सशक्तीकरणाच्या आणि पुरोगामित्वाचा आव आणनारे राज्यकर्ते महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी का देत नाहीत. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा मर्जी सांभाळणारे रबरी शिक्के प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर बसवून जिल्ह्याच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रकार वाटतो. हे सर्व जनता बघत आहे, असेही बोर्डीकर म्हणाल्या.

सोशल मीडियावरही जोरदार टीका

आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सुभाष बाकळे म्हणतात, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणून आर्थिक हित साधण्याचा केविलवाणा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. संतोष आसेगावकर म्हणतात, आता परभणीला ग्रामपंचायच करून टाका. प्रा. डॉ. विजय पव्हने म्हणतात, परभणीच्या राजकारणाला कीड लागली आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकऱ्याचा नियुक्तीपूर्वीच बळी घेताला गेला आहे. संजय मंत्री म्हणतात, परभणीला चांगले अधिकारी नको आहेत. त्यामुळे हा निर्णय होईल, असे अपेक्षितच होते.