शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

परभणीत फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करून परभणीत फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत का? असा संतप्त ...

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करून परभणीत फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत का? असा संतप्त सवाल भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी मुंबई येथील आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. ३१ जुलैरोजी दुपारनंतर त्या मावळते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून पदभार स्वीकारणार होत्या. तत्पूर्वीच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आंचल यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले आहे. ३० जुलैरोजी आंचल यांची नियुक्ती रद्द केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत बोलताना जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्याला कडक शिस्तीचे अधिकारी कोणाला नको आहेत? की महाविकास आघाडी सरकारलाच चांगले अधिकारी नकोत? त्यांना फक्त ‘वसुली अधिकारीच’ हवे आहेत? महिला सशक्तीकरणाच्या आणि पुरोगामित्वाचा आव आणनारे राज्यकर्ते महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी का देत नाहीत. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा मर्जी सांभाळणारे रबरी शिक्के प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर बसवून जिल्ह्याच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रकार वाटतो. हे सर्व जनता बघत आहे, असेही बोर्डीकर म्हणाल्या.

सोशल मीडियावरही जोरदार टीका

आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सुभाष बाकळे म्हणतात, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणून आर्थिक हित साधण्याचा केविलवाणा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. संतोष आसेगावकर म्हणतात, आता परभणीला ग्रामपंचायच करून टाका. प्रा. डॉ. विजय पव्हने म्हणतात, परभणीच्या राजकारणाला कीड लागली आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकऱ्याचा नियुक्तीपूर्वीच बळी घेताला गेला आहे. संजय मंत्री म्हणतात, परभणीला चांगले अधिकारी नको आहेत. त्यामुळे हा निर्णय होईल, असे अपेक्षितच होते.