शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

निराधारांची दिवाळी अंधारात; १६ कोटीं अभावी दोन महिन्यांचे थकले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:54 IST

राज्यातील अल्प उत्पन्न, निराधार नागरिकांना जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रतिमाह १ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून दिले जाते.

ठळक मुद्देया योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ हजार २ लाभार्थी आहेत.

परभणी : जिल्ह्यातील विविध योजनांच्या सुमारे दीड लाख निराधार लाभार्थ्याांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. जिल्हा प्रशासनाने या वेतनासाठी शासनाकडे १६ कोटी ८६ लाख रुपयांची मागणी नोंदविली असताना निधी उपलब्ध झाला नसल्याने निराधारांना दिवाळीचा सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

राज्यातील अल्प उत्पन्न, निराधार नागरिकांना जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रतिमाह १ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून दिले जाते. या अनुदानासाठी जिल्हा प्रशासनाला स्वतंत्र निधी उपलब्ध होतो. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

जिल्हा प्रशासनाला या योजनेसाठी प्राप्त झालेल्या रकमेतून ऑगस्ट महिन्यापर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मात्र त्या पुढील दोन महिन्यांसाठी निधी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. मागील महिन्यात जिल्हा प्रशासनाने १६ कोटी ८६ लाख रुपयांची मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. मात्र अद्यापपर्यंत हा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दिवाळीचा सण सुरू झाला, तरी निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर रखडलेले अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे या दिवाळीत निराधारांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

संगांयोचे अनुदान तीन महिन्यांपासून ठप्पजिल्ह्यातील इतर योजनांच्या तुलनेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची तीन महिन्यांपासून परवड होत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ हजार २ लाभार्थी आहेत. जिल्ह्याला या लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी ८ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून जुलै महिन्यापर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले. पुढील तीन महिन्यांच्या अनुदानासाठी निधी उपलब्ध नाही. त्यासाठी ५ कोटी ४३ लाख रुपयांची मागणी प्रशासनाने नोंदविली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी