शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परभणी राज्यात जिल्हा २९ व्या स्थानावर : केवळ २३ कामांमधूनच स्वच्छतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:48 IST

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.२ आॅक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश स्वच्छ करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या मदतीने स्वच्छता हीच सेवा हे अभियान सुरु केले. राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अंतर्गत अभियान राबविले जात आहे. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या काळात जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे करुन अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली होती. मात्र याकामी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे हाती घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागरण करणे अशा उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानाचा राज्यस्तरावरुन दररोज लेखाजोखाही घेतला जात आहे. दररोज जिल्हाभरात झालेल्या कामांची नोंद राज्यस्तरावर घेतली जात असून त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची क्रमवारी ठरविली जात आहे; परंतु, जिल्ह्यात या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एक सोपस्कर म्हणून अभियानाकडे पाहिले जात आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यस्तरावरील जिल्ह्यांच्या कामगिरीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये परभणी जिल्हा राज्यात २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात स्वच्छतेची केवळ २३ कामे झाली. त्यामुळे स्वच्छता ही सेवा हा केवळ सोपस्कार म्हणून राबविला जात असल्याचे दिसत आहे. परिणामी या अभियानाला थंड प्रतिसाद मिळत आहे.परभणी जिल्ह्यातूनच अभियानाची सुरुवातमहाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यात सुरु केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचे उद्घाटन परभणी जिल्ह्यातूृन झाले होते, हे विशेष.१५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परभणी येथे राज्यातील या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे अभियानाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते मात्र परभणी जिल्ह्यातच थंड प्रतिसाद मिळत आहे.नाशिक जिल्हा राज्यात अव्वलस्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत क्रमांक एकवर आहे. या अभियानामध्ये २८ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेची तब्बल ३४५० कामे झाली आहेत. सातारा जिल्हा दुसºया क्रमांकावर असून या जिल्ह्यात १२२५ कामे झाली. मराठवाड्यात मात्र अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ८२ कामे झाली असून हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत १९ व्या स्थानावर आहे. ६१ कामांसह लातूर जिल्हा २० व्या, ५० कामांसह हिंगोली जिल्हा २१ व्या क्रमांकावर आहे. नांदेड जिल्ह्यात ३७ कामे झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात २८ कामे झाली आहेत. औरंगाबाद राज्याच्या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे. तर जालना जिल्हा ३५ व्या क्रमांकावर आणि उस्मानाबाद जिल्हा ३६ व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीNashikनाशिकOsmanabadउस्मानाबादBeedबीड