शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
2
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
3
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
4
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
5
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
6
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
7
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
8
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
9
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
10
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
11
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
12
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
13
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
14
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
15
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
16
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
17
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
18
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
19
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
20
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी राज्यात जिल्हा २९ व्या स्थानावर : केवळ २३ कामांमधूनच स्वच्छतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:48 IST

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.२ आॅक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश स्वच्छ करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या मदतीने स्वच्छता हीच सेवा हे अभियान सुरु केले. राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अंतर्गत अभियान राबविले जात आहे. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या काळात जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे करुन अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली होती. मात्र याकामी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे हाती घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागरण करणे अशा उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानाचा राज्यस्तरावरुन दररोज लेखाजोखाही घेतला जात आहे. दररोज जिल्हाभरात झालेल्या कामांची नोंद राज्यस्तरावर घेतली जात असून त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची क्रमवारी ठरविली जात आहे; परंतु, जिल्ह्यात या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एक सोपस्कर म्हणून अभियानाकडे पाहिले जात आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यस्तरावरील जिल्ह्यांच्या कामगिरीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये परभणी जिल्हा राज्यात २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात स्वच्छतेची केवळ २३ कामे झाली. त्यामुळे स्वच्छता ही सेवा हा केवळ सोपस्कार म्हणून राबविला जात असल्याचे दिसत आहे. परिणामी या अभियानाला थंड प्रतिसाद मिळत आहे.परभणी जिल्ह्यातूनच अभियानाची सुरुवातमहाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यात सुरु केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचे उद्घाटन परभणी जिल्ह्यातूृन झाले होते, हे विशेष.१५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परभणी येथे राज्यातील या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे अभियानाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते मात्र परभणी जिल्ह्यातच थंड प्रतिसाद मिळत आहे.नाशिक जिल्हा राज्यात अव्वलस्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत क्रमांक एकवर आहे. या अभियानामध्ये २८ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेची तब्बल ३४५० कामे झाली आहेत. सातारा जिल्हा दुसºया क्रमांकावर असून या जिल्ह्यात १२२५ कामे झाली. मराठवाड्यात मात्र अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ८२ कामे झाली असून हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत १९ व्या स्थानावर आहे. ६१ कामांसह लातूर जिल्हा २० व्या, ५० कामांसह हिंगोली जिल्हा २१ व्या क्रमांकावर आहे. नांदेड जिल्ह्यात ३७ कामे झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात २८ कामे झाली आहेत. औरंगाबाद राज्याच्या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे. तर जालना जिल्हा ३५ व्या क्रमांकावर आणि उस्मानाबाद जिल्हा ३६ व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीNashikनाशिकOsmanabadउस्मानाबादBeedबीड