शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

१० हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २८ डिसेंबरपर्यंत बँकांच्या उदासीन भूमिकेमुळे केवळ ९ हजार ८६१ शेतकऱ्यांनाच ५३ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या रबी हंगामात तरी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामातून हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. रबी पेरणीचा हंगाम पूर्ण झाला आहे. मात्र, २८ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ८६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खाजगी बँकांचा आखडता हात

यावर्षीच्या रबी हंगामात जवळपास १० हजार शेतकऱ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये खाजगी बँकांनी १८५ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार १३२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५१ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३ हजार ४२१ शेतकऱ्यांना १५ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक बँकांनी २ हजार १२३ शेतकऱ्यांना १५ कोटी ९९ लाख रुपयांचा लाभ दिला आहे.