शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

१० हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २८ डिसेंबरपर्यंत बँकांच्या उदासीन भूमिकेमुळे केवळ ९ हजार ८६१ शेतकऱ्यांनाच ५३ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या रबी हंगामात तरी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामातून हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. रबी पेरणीचा हंगाम पूर्ण झाला आहे. मात्र, २८ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ८६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खाजगी बँकांचा आखडता हात

यावर्षीच्या रबी हंगामात जवळपास १० हजार शेतकऱ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये खाजगी बँकांनी १८५ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार १३२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५१ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३ हजार ४२१ शेतकऱ्यांना १५ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक बँकांनी २ हजार १२३ शेतकऱ्यांना १५ कोटी ९९ लाख रुपयांचा लाभ दिला आहे.