शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१० हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २८ डिसेंबरपर्यंत बँकांच्या उदासीन भूमिकेमुळे केवळ ९ हजार ८६१ शेतकऱ्यांनाच ५३ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या रबी हंगामात तरी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामातून हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. रबी पेरणीचा हंगाम पूर्ण झाला आहे. मात्र, २८ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ८६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खाजगी बँकांचा आखडता हात

यावर्षीच्या रबी हंगामात जवळपास १० हजार शेतकऱ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये खाजगी बँकांनी १८५ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार १३२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५१ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३ हजार ४२१ शेतकऱ्यांना १५ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक बँकांनी २ हजार १२३ शेतकऱ्यांना १५ कोटी ९९ लाख रुपयांचा लाभ दिला आहे.