शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

परभणी जिल्ह्यात ५ टक्केच पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:39 IST

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.गतवर्षी शेतकºयांनी उसणवारी करुन व बँकांमधून पीक कर्ज मिळेल, या आशेवर खरीप हंगामामध्ये पेरणी केली होती. लाखो रुपयांचा खर्च करून काळ्या आईची ओटी भरली होती; परंतु, जून व जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात केलेली पेरणी धुळीस मिळाली. जिल्ह्यातील ६ तालुके राज्य शासनाच्यागंभीर दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले.या शेतकºयांच्या हातात सध्या छदामही नाही. त्यातच यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी कशी करावी? या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे.१५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ४.८८ टक्के पीक कर्ज वाटप करीत ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचा लाभ दिला आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ३ हजार २०१ शेतकºयांना ३६ कोटी १५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ३.४४ टक्केचे उद्दिष्ट गाठले आहे. त्याचबरोबर खाजगी बँकांनी ६९४ शेतकºयांना ८ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत १६.१६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ८१३ शेतकºयांना ७ कोटी २ लाख रुपयांच्या रक्कमेचे वाटप करून सर्वात कमी ३.५१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक ७ हजार १७३ शेतकºयांना २० कोटी ५ लाख रुपयांची रक्कम वाटप करीत १२.१२ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.दरम्यान, खरीप हंगामातील बहुतांश ठिकाणी पेरणी सुरू झाली असतानाही बँकांंनी मात्र पीक कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणीजिल्ह्यात खरीप हंगामाचा मौसम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी बी बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत; परंतु, गतवर्षीच्या दुष्काळाचे संकट पचवून यावर्षीच्या खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकºयांकडे छदामही उपलब्ध नाही. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना उभारी देण्यासाठी पीक कर्जाची गती वाढवावी, यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा