शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

परभणी जिल्ह्यात ५ टक्केच पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:39 IST

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.गतवर्षी शेतकºयांनी उसणवारी करुन व बँकांमधून पीक कर्ज मिळेल, या आशेवर खरीप हंगामामध्ये पेरणी केली होती. लाखो रुपयांचा खर्च करून काळ्या आईची ओटी भरली होती; परंतु, जून व जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात केलेली पेरणी धुळीस मिळाली. जिल्ह्यातील ६ तालुके राज्य शासनाच्यागंभीर दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले.या शेतकºयांच्या हातात सध्या छदामही नाही. त्यातच यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी कशी करावी? या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे.१५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ४.८८ टक्के पीक कर्ज वाटप करीत ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचा लाभ दिला आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ३ हजार २०१ शेतकºयांना ३६ कोटी १५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ३.४४ टक्केचे उद्दिष्ट गाठले आहे. त्याचबरोबर खाजगी बँकांनी ६९४ शेतकºयांना ८ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत १६.१६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ८१३ शेतकºयांना ७ कोटी २ लाख रुपयांच्या रक्कमेचे वाटप करून सर्वात कमी ३.५१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक ७ हजार १७३ शेतकºयांना २० कोटी ५ लाख रुपयांची रक्कम वाटप करीत १२.१२ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.दरम्यान, खरीप हंगामातील बहुतांश ठिकाणी पेरणी सुरू झाली असतानाही बँकांंनी मात्र पीक कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणीजिल्ह्यात खरीप हंगामाचा मौसम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी बी बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत; परंतु, गतवर्षीच्या दुष्काळाचे संकट पचवून यावर्षीच्या खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकºयांकडे छदामही उपलब्ध नाही. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना उभारी देण्यासाठी पीक कर्जाची गती वाढवावी, यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा