शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

निम्न दुधना प्रकल्पातून नदीपाञात पाणी सोडले; तीन तालुक्यातील ५० गावांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:21 IST

नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शुक्रवारी दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडले आहे.

ठळक मुद्देटेल पर्यंत पाणी जाण्यासाठी १२. ७७ दलघमी एवढे पाणी लागणार दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत ६९ टक्के जिवंत जलसाठा आहे. 

सेलू ( परभणी ) : दुधना नदीकाठावरील गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने निम्न दुधना प्रकल्पातून शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजता ६ दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील परभणी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यातील ५० गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

मे महिन्यात दुधना नदी काठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नदीकाठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी दुधना नदीपाञात आहेत. पंरतु, पाणी पातळीत घट झाल्याने नदीकाठावरील गावांना पाणी पुरवठा करतांना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना पाण्यासाठी भंटकती करण्याची वेळ आली होती. पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला १९ मे रोजी पञ देऊन नदीपाञात पाणी सोडण्याची सुचना केली होती. त्यानंतर जिपचे अग्रीम पाणीपट्टी पञाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी प्रकल्पाचे १, २०,२, १९ हे चार दरवाजे २० सेंमी ने तर १८ व ३ क्रमांकाचे १० सेंमी दरवाजे उचलून ३०५६ क्युसेस विसर्ग नदीपाञात सोडण्यात आला आहे. दुधना प्रकल्प ते पूर्णा संगमापर्यंतचे ६८ किमी अंतर आहे. संगमापर्यंत पाणी पोहचण्यासाठी ४१ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.नदीपाञात पाणी सोडल्याने सेलू तालुक्यातील १७ परभणी तालुक्यातील २५ तर मानवत तालुक्यातील ८ अशा एकूण ५० गावांची तहान भागणार आहे. दरम्यान,  परभणीचे आ.डाॅ राहूल पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. 

१२.७७ दलघमी पाणी लागणार नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शुक्रवारी दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपाञात पाणी सोडले आहे. टेल पर्यंत पाणी जाण्यासाठी १२. ७७ दलघमी एवढे पाणी लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सुञांनी सांगितले. दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत ६९ टक्के जिवंत जलसाठा आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी