शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

येलदरीतून तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग; मुसळधार पावसाने अनेक मार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 16:31 IST

rain in Parabhani : येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

येलदरी (ता.जिंतूर) : येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील अनेक मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शिवाय येलदरी प्रकल्पातून मागच्या तीन दिवसांपासून दहाही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे.

येलदरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरण प्रशासनाला पूरनियंत्रण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. येलदरी धरणाचे दहाही दरवाजे तीन दिवसांपासून सुरू असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे. या मुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान येलदरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच येलदरी- जिंतूर हा राज्य रस्ता तीन तासाहून अधिक वेळ बंद राहिला. तसेच येलदरी- इटोली या रस्त्यावर देखील हिवरखेडा गावजवळ ओढयाला पूर आल्याने हिवरखेडा, सावळी, घडोळी, रामप्रसादनागर, दिग्रस, ढाबा, इटोली, मांडवा ,खोलगडगा आदी १० गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. ७ सप्टेंबरपासून पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातुन पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे.पूर्णा प्रकल्पात वर्षात सरासरी ६५० ते ७५० मिमी पाऊस होतो. यावर्षी धरण परिसरात ११४० मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरात पावसाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

पिकांना बसला फटकाया पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला असून, खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी