शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योगातून विकासाचा ध्यास; कोल्हावाडीत ३२ महिलांच्या गटाने केली तुतीच्या नर्सरीची स्थापना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:10 IST

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे. 

ठळक मुद्दे हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेतला३२ महिला शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे. 

मानवत तालुक्यात यावर्षी सोयाबीन, कापूस पिकांनी दगा दिला आहे. बोंडअळीमुळे कापसाचे सर्व क्षेत्र हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस पीक घ्यायचे की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न निघेल व आपला विकास होईल, अशी अपेक्षा बाळगून येथील ३२ महिला शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील वातावरणही रेशीमसाठी अनुकूल असून राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षापासून  मनरेगा योजने अंतर्गत रेशीम कोष उत्पादनासाठी तुती लागवड करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी कुशल ९० हजार, अकुशलसाठी २ लाख असे २ लाख ९० हजार रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील महिलांनी एकत्र येत ३२ महिलांचा गट तयार केला.

या गटामध्ये गावातील इतर बचतगटातील महिलांनीही सामावून घेतले. सध्या मनरेगा योजनेअंतर्गत तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुतीची लागवड करुन नर्सरी सुरु केली असून रेशीम कोष, तुती लागवडीसाठी देवनांद्रा येथील माऊली टेकाळे यांच्या रेशीम कोष उद्योगाला या महिला गटांनी नुकतीच भेट देऊन रेशीम उद्योगाची पाहणी केली. या गटामध्ये माजी सरपंच वर्षा भिसे, शारदा भिसे, मीरा भिसे, उषा भिसे, उर्मिला भिसे, अनुराधा भिसे, वंदना भिसे, सरस्वती भिसे, मनकर्णा भिसे, कमल भिसे आदी महिलांचा समावेश आहे. सामूहिक शेती करुन रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला शेतकरी येत असून रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून शेती करण्याचा मनोदयही केला जात आहे. 

बाजारपेठेत मागणीजागतिक बाजारपेठेमध्ये रेशीम कोषाला चांगली मागणी आहे. नगदी पीक असल्याने यातून आर्थिक विकास साधता येतो. तालुक्यातील वातावरणही पोषक असून या माध्यमातून शेती करता येते, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडेसे नियोजन व मेहनत घेण्याची तयारी महिलांनी केली असून थोड्या शेतीमध्ये जास्त उत्पादन काढण्याची संधी निर्माण झाली आहे. महिलाही सकाळपासूनच तुतीचे रोपे जोपासण्यासाठी कामाला लागत आहेत.

महिलांचा सहभाग महत्त्वाचाराज्य शासनाने तुती लागवडीचा मनरेगा योजनेत समावेश केला आहे. शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरणारा आहे. कोल्हावाडी येथील महिला शेतकरी पुढे आल्या असून रेशीम कोष उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे. - डी.ए. हाके, सहाय्यक संचालक

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी