शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रेशीम उद्योगातून विकासाचा ध्यास; कोल्हावाडीत ३२ महिलांच्या गटाने केली तुतीच्या नर्सरीची स्थापना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:10 IST

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे. 

ठळक मुद्दे हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेतला३२ महिला शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे. 

मानवत तालुक्यात यावर्षी सोयाबीन, कापूस पिकांनी दगा दिला आहे. बोंडअळीमुळे कापसाचे सर्व क्षेत्र हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस पीक घ्यायचे की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न निघेल व आपला विकास होईल, अशी अपेक्षा बाळगून येथील ३२ महिला शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील वातावरणही रेशीमसाठी अनुकूल असून राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षापासून  मनरेगा योजने अंतर्गत रेशीम कोष उत्पादनासाठी तुती लागवड करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी कुशल ९० हजार, अकुशलसाठी २ लाख असे २ लाख ९० हजार रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील महिलांनी एकत्र येत ३२ महिलांचा गट तयार केला.

या गटामध्ये गावातील इतर बचतगटातील महिलांनीही सामावून घेतले. सध्या मनरेगा योजनेअंतर्गत तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुतीची लागवड करुन नर्सरी सुरु केली असून रेशीम कोष, तुती लागवडीसाठी देवनांद्रा येथील माऊली टेकाळे यांच्या रेशीम कोष उद्योगाला या महिला गटांनी नुकतीच भेट देऊन रेशीम उद्योगाची पाहणी केली. या गटामध्ये माजी सरपंच वर्षा भिसे, शारदा भिसे, मीरा भिसे, उषा भिसे, उर्मिला भिसे, अनुराधा भिसे, वंदना भिसे, सरस्वती भिसे, मनकर्णा भिसे, कमल भिसे आदी महिलांचा समावेश आहे. सामूहिक शेती करुन रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला शेतकरी येत असून रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून शेती करण्याचा मनोदयही केला जात आहे. 

बाजारपेठेत मागणीजागतिक बाजारपेठेमध्ये रेशीम कोषाला चांगली मागणी आहे. नगदी पीक असल्याने यातून आर्थिक विकास साधता येतो. तालुक्यातील वातावरणही पोषक असून या माध्यमातून शेती करता येते, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडेसे नियोजन व मेहनत घेण्याची तयारी महिलांनी केली असून थोड्या शेतीमध्ये जास्त उत्पादन काढण्याची संधी निर्माण झाली आहे. महिलाही सकाळपासूनच तुतीचे रोपे जोपासण्यासाठी कामाला लागत आहेत.

महिलांचा सहभाग महत्त्वाचाराज्य शासनाने तुती लागवडीचा मनरेगा योजनेत समावेश केला आहे. शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरणारा आहे. कोल्हावाडी येथील महिला शेतकरी पुढे आल्या असून रेशीम कोष उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे. - डी.ए. हाके, सहाय्यक संचालक

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी