शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या मागणीसाठी परभणीतील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: April 26, 2017 13:44 IST

तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करुनही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला.

 ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 26 -  तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 22 एप्रिलपर्यंत रांगेत असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी परभणीत तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वसमत रस्त्यावर पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले.
 
जिल्ह्यातील 5 हमीभाव तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी बंद झाले आहेत. केंद्र बंद असले तरी खरेदीला मुदतवाढ मिळेल, या आशेने परभणीत तूर घेऊन आलेले शेकडो वाहने रांगेत उभी आहेत. 
 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, अशाची तूर खरेदी करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. मात्र परभणी येथे अद्याप तसे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने बुधवारी सकाळी परभणीत तूर खरेदी बंदच होती. शासनाचे जसे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे खरेदी सुरू केली जाईल, असे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
संतप्त शेतकरी रस्त्यावर
दरम्यान, बुधवारी सकाळी तूर खरेदी सुरु झाली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माकपचे विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली परभणी- वसमत रस्त्यावर खरेदी केंद्राजवळच पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून शेतकरी तूर विकण्यासाठी नफेडच्या खरेदी केंद्रावर रांगेत आहेत.  तेव्हा सर्व तुरीची खरेदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. 
 
शेतकऱ्यांचा मालाला आधारभूत भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे तूर खरेदी करुन सरकार उपकार करत नाही. जे व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करतील, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई शासनाने केली पाहिजे. रांगेत असलेल्या आणि घरी साठवून ठेवलेल्या सर्व तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे द्यावेत, अशी मागणी विलास बाबर यांनी केली.
 
परभणीत ९५ वाहनांची नोंदणी
परभणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत ९५ वाहनांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे.
 
आदेश येताच होणार केंद्र सुरू
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २२ एप्रिलपर्यंत १ लाख १८ हजार ६६६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. रांगेत असलेल्या वाहनांची नोंदणी झाली असून, शासनाचे आदेश प्राप्त होताच खरेदी केंद्र सुरू केले जाईल. - के जे शेवाळे, सहायक मार्केटिंग अधिकारी