शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तूर खरेदीच्या मागणीसाठी परभणीतील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: April 26, 2017 13:44 IST

तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करुनही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला.

 ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 26 -  तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 22 एप्रिलपर्यंत रांगेत असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी परभणीत तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वसमत रस्त्यावर पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले.
 
जिल्ह्यातील 5 हमीभाव तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी बंद झाले आहेत. केंद्र बंद असले तरी खरेदीला मुदतवाढ मिळेल, या आशेने परभणीत तूर घेऊन आलेले शेकडो वाहने रांगेत उभी आहेत. 
 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, अशाची तूर खरेदी करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. मात्र परभणी येथे अद्याप तसे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने बुधवारी सकाळी परभणीत तूर खरेदी बंदच होती. शासनाचे जसे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे खरेदी सुरू केली जाईल, असे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
संतप्त शेतकरी रस्त्यावर
दरम्यान, बुधवारी सकाळी तूर खरेदी सुरु झाली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माकपचे विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली परभणी- वसमत रस्त्यावर खरेदी केंद्राजवळच पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून शेतकरी तूर विकण्यासाठी नफेडच्या खरेदी केंद्रावर रांगेत आहेत.  तेव्हा सर्व तुरीची खरेदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. 
 
शेतकऱ्यांचा मालाला आधारभूत भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे तूर खरेदी करुन सरकार उपकार करत नाही. जे व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करतील, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई शासनाने केली पाहिजे. रांगेत असलेल्या आणि घरी साठवून ठेवलेल्या सर्व तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे द्यावेत, अशी मागणी विलास बाबर यांनी केली.
 
परभणीत ९५ वाहनांची नोंदणी
परभणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत ९५ वाहनांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे.
 
आदेश येताच होणार केंद्र सुरू
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २२ एप्रिलपर्यंत १ लाख १८ हजार ६६६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. रांगेत असलेल्या वाहनांची नोंदणी झाली असून, शासनाचे आदेश प्राप्त होताच खरेदी केंद्र सुरू केले जाईल. - के जे शेवाळे, सहायक मार्केटिंग अधिकारी