शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

नुकसानभरपाईसाठी ४५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली. तसेच काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे पिकांचे ...

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली. तसेच काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके बेचिराख झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला असून बाधित पीक क्षेत्राची नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ६६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात ६५ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके असून, ५४९ हेक्टरवरील बागायती तर ६९.८० हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ४५ कोटी ४१ लाख २७ हजार रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. ही रक्कम प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाणार आहे.

परभणी, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिंतूर आणि परभणी या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. ११ जुलै रोजी परभणी तालुक्याच्या परिसरात अतिवृष्टी झाली होती. ढगफुटीसदृश या पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी शिरले होते. तसेच २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत जिंतूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार परभणी तालुक्यात ३० हजार ३८६ हेक्टर तर जिंतूर तालुक्यात २२ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

सहा हजार आठशे रुपयांप्रमाणे मागणी

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने जिरायती पिकासाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शासनाकडे निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

तालुकानिहाय नोंद केलेली मागणी

परभणी २०९५.८७

जिंतूर १५१९.८७

पाथरी ४.४७

सोनपेठ १०.८८

पालम ४००.१८

पूर्णा ५१०.००

एकूण ४५४१.२७

रक्कम कोटीत