शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नुकसानभरपाईसाठी ४५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली. तसेच काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे पिकांचे ...

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली. तसेच काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके बेचिराख झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला असून बाधित पीक क्षेत्राची नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ६६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात ६५ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके असून, ५४९ हेक्टरवरील बागायती तर ६९.८० हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ४५ कोटी ४१ लाख २७ हजार रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. ही रक्कम प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाणार आहे.

परभणी, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिंतूर आणि परभणी या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. ११ जुलै रोजी परभणी तालुक्याच्या परिसरात अतिवृष्टी झाली होती. ढगफुटीसदृश या पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी शिरले होते. तसेच २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत जिंतूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार परभणी तालुक्यात ३० हजार ३८६ हेक्टर तर जिंतूर तालुक्यात २२ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

सहा हजार आठशे रुपयांप्रमाणे मागणी

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने जिरायती पिकासाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शासनाकडे निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

तालुकानिहाय नोंद केलेली मागणी

परभणी २०९५.८७

जिंतूर १५१९.८७

पाथरी ४.४७

सोनपेठ १०.८८

पालम ४००.१८

पूर्णा ५१०.००

एकूण ४५४१.२७

रक्कम कोटीत