शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना शाळेत पुस्तके परत करण्यास संचारबंदीचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. गेल्या शैक्षणिक वर्षातही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. गेल्या शैक्षणिक वर्षातही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली होती. गतवर्षी कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊ शकले नाही. असे असले तरी नवीन पुस्तकांची मागणी नोंदविण्यापूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांना दिलेली पुस्तके परत घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. जिल्ह्यात कोरोनामुळे दीड महिन्यापासून संचारबंदी आहे. त्यामुळे पालकांकडून ही पुस्तके कशी परत घ्यावी, या संभ्रमात जिल्ह्यातील अधिकाऱी आहेत. शिवाय काही पुस्तके परत आली, तरी ती वितरित करण्यावरून वाद होण्याची भीती आहे.

पालक म्हणतात...

सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच प्रशासनाचे संचारबंदीचे आदेश असताना, घराबाहेर कसे पडणार? कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शाळेला निश्चितच सर्व पुस्तके परत करणार आहे. कारण नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांची गरज लागणार आहे.

- विजय सोनवणे, परभणी

गेल्यावर्षी मुलाला शाळेतून पुस्तके मिळाली. मुलगा पुढील वर्गात गेला आहे. त्यामुळे ही पुस्तके परत करायची आहेत; सध्या बाहेरील वातावरण घोकादायक आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे जिकिरीचे आहे. कोरोना कमी झाला की सर्व पुस्तके शाळेला परत देणार आहे.

- ज्ञानेश्वर दळवे, सोनपेठ

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीची पुस्तके परत करण्याचा आमचा मानस असला,तरी ही पुस्तके द्यायची कुठे? हा प्रश्न आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ही पुस्तके परत देणार आहोत. कारण ती इतर गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगी येणार आहेत.

- परमेश्वर पैंजणे, सोनपेठ