शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी पायदळी तुडवत मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

परभणी; : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने धास्तीचे चित्र निर्माण केले असले तरी परभणीत मात्र नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा विसर पडला ...

परभणी; : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने धास्तीचे चित्र निर्माण केले असले तरी परभणीत मात्र नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा विसर पडला असून, शासनाच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन करत बिनधास्तपणे शहरात वर्दळ सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाची संचारबंदी पुन्हा एकदा दुकान बंद ठरली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १५ एप्रिलपासून कडकडीत बंद राहील आणि रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण होईल, अशी धारणा झाली होती; परंतु सकाळपासूनच गर्दीचे चित्र शहरात दिसून येत आहे. सर्वच रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वाहतूक आहे. त्यामुळे संचारबंदीचा पार बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंधांचा हा मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी मात्र या निर्णयाला अजूनही गांभीर्याने घेतले नाही. शहरात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून मृत्यूचे प्रमाण वाढत असताना निष्काळजीपणा करीत अनेक नागरिक रस्त्यांवर उतरत आहेत. नागरिकांच्या या मुक्तसंचारामुळे प्रशासनाने निर्बंध लावले, तो हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून देखील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिवसभरात झाले नाहीत. शिवाजी चौक आणि इतर मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असला तरी एकाही नागरिकाला तो घराबाहेर का पडला? हे विचारण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपासणी झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे मनोबल आणखीच वाढत असून, दिवसभर शहरातील सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक पाहावयास मिळाली. संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाने पावले उचलावीत, थोडीसे कठोर होऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता होत आहे.

सर्वच नागरिक अत्यावश्यक सेवेत

गुरुवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाढलेली वाहतूक पाहता शहरातील सर्वच नागरिक अत्यावश्यक सेवेत मोडतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने काही जणांनाच अत्यावश्यक सेवेसाठी शहरात फिरण्याची मुभा दिली आहे; परंतु असे असतानाही शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बाजारपेठेतील उलाढाल ठप्प

संचारबंदीमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणेच नागरिक सर्व व्यवहार करीत होते. रस्ते वाहतुकीने फुल्ल होते; परंतु या संचारबंदीचा व्यावसायिकांवर मात्र मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांनाच संचारबंदीचा फटका सहन करावा लागत आहे.