शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

संचारबंदी पायदळी तुडवत मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

परभणी; : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने धास्तीचे चित्र निर्माण केले असले तरी परभणीत मात्र नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा विसर पडला ...

परभणी; : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने धास्तीचे चित्र निर्माण केले असले तरी परभणीत मात्र नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा विसर पडला असून, शासनाच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन करत बिनधास्तपणे शहरात वर्दळ सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाची संचारबंदी पुन्हा एकदा दुकान बंद ठरली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १५ एप्रिलपासून कडकडीत बंद राहील आणि रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण होईल, अशी धारणा झाली होती; परंतु सकाळपासूनच गर्दीचे चित्र शहरात दिसून येत आहे. सर्वच रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वाहतूक आहे. त्यामुळे संचारबंदीचा पार बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंधांचा हा मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी मात्र या निर्णयाला अजूनही गांभीर्याने घेतले नाही. शहरात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून मृत्यूचे प्रमाण वाढत असताना निष्काळजीपणा करीत अनेक नागरिक रस्त्यांवर उतरत आहेत. नागरिकांच्या या मुक्तसंचारामुळे प्रशासनाने निर्बंध लावले, तो हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून देखील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिवसभरात झाले नाहीत. शिवाजी चौक आणि इतर मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असला तरी एकाही नागरिकाला तो घराबाहेर का पडला? हे विचारण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपासणी झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे मनोबल आणखीच वाढत असून, दिवसभर शहरातील सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक पाहावयास मिळाली. संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाने पावले उचलावीत, थोडीसे कठोर होऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता होत आहे.

सर्वच नागरिक अत्यावश्यक सेवेत

गुरुवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाढलेली वाहतूक पाहता शहरातील सर्वच नागरिक अत्यावश्यक सेवेत मोडतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने काही जणांनाच अत्यावश्यक सेवेसाठी शहरात फिरण्याची मुभा दिली आहे; परंतु असे असतानाही शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बाजारपेठेतील उलाढाल ठप्प

संचारबंदीमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणेच नागरिक सर्व व्यवहार करीत होते. रस्ते वाहतुकीने फुल्ल होते; परंतु या संचारबंदीचा व्यावसायिकांवर मात्र मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांनाच संचारबंदीचा फटका सहन करावा लागत आहे.