शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अमिताभ बच्चन यांच्याविरूद्धचा फौजदारी दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 20:21 IST

वकिलांची बदनामी केल्याचा होता आरोप

परभणी- कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात वकिलांची बदनामी केल्याच्या प्रकरणात चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीचे संचालक, निर्मात्याविरूद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी पुनर्विचार दावा परभणी येथील सहाय्यक सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

या संदर्भात परभणी येथील अ‍ॅड़ राजू शिंदे यांनी दिलेली माहिती अशी, सोनी या दूरचित्रवाहिणीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून वकिलांची बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा चित्रपट अभिनेता अभिताभ बच्चन, सोनी टीव्हीचे संचालक विवेक बहल, निर्माता सिद्धार्थ बासू यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अ‍ॅड़ विष्णू नवले पाटील यांनी १४ आॅगस्ट २०१३ मध्ये दाखल केली होती़ त्यानंतर या प्रकरणात दोन्ही बाजुंनी सुनावणी होवून न्यायालयाने या कार्यक्रमातील जाहिरातीतून वकिलांची बदनामी होत नाही, असे मानून ती तक्रार १० डिसेंबर २०१३ मध्ये खारीज केली होती.

याविरूद्ध अ‍ॅड़ नवले पाटील यांनी सत्र न्यायालयात फौजदारी पुनर्विचार अर्ज १८ डिसेंबर २०१३ मध्ये दाखल केला होता़ सत्र न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून असा निष्कर्ष काढला की, कौन बनेगा करोडपती कार्यक्रमासंदर्भातील जाहिरात वकिलांची बदनामी करीत नाही तर उलट ती जाहिरात वकिलांच्या समर्थनार्थ ठरते़ कारण ‘सिखना बंद तो जितना बंद’ हे वाक्य वकिलांना सल्ला देते़ म्हणून संबंधित अर्ज जिल्हा न्या़ ओंकार देशमुख यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी फेटाळला़ या प्रकरणात अमिताभ बच्चन व सोनी टीव्हीतर्फे अ‍ॅड़ राजू शिंदे यांनी काम पाहिले़ त्यांना अ‍ॅड़ मोहम्मद शाहेद यांनी सहाय्य केले़ या प्रकरणाचे निकालपत्र ६ डिसेंबर २०१८ रोजी प्राप्त झाले़

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय