शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

CoronaVirus : राहणे आणि जेवणाची चिंता; रेल्वेरुळाच्या मार्गाने आग्र्याकडे निघाले १४ मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:34 IST

परभणीत बांधकाम मजूर म्हणून होते कामाला

ठळक मुद्देपरभणीवरून निघाले होते सर्वजण

सेलू:-  परभणीहून रेल्वे पटरी मार्गाने उतर प्रदेशातील आग्रा येथे पायी निघालेल्या १४ मजुरांना सेलू पोलीसांनी रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी दुपारी ४ वाजता ताब्यात घेतले. त्यांना शहरातील एका वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.

परभणी शहरात सेंट्रिंगचे काम करणारे उतर प्रदेशातील फरिदाबाद येथील १४ कामगार अडकून पडले होते. १७ मार्च रोजी ते कामासाठी परभणी शहरात आले होते. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून २० मार्च रोजी देशभरात लाॅकडाऊन झाल्या नंतर या कामगारांना हाताला काम मिळाले नाही. राहण्यासाठी घर आणि अन्नाची सोय नाही. रेल्वे आणि बस वाहतूक ही बंद झाल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे रेल्वे पटरी मार्गाने उतरप्रदेशातील आग्रा येथे जाणा-या साठी हे कामगार बुधवारी सकाळीच परभणीहून पायपीट करत निघाले.

सेलू तालुक्यातील डिग्रस जहागिर शिवारातील पटरी शेजारी शेत असलेल्या काही शेतक-यांनी त्यांना पाहिले. पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर ते कामगार पुन्हा पटरीने सेलू कडे निघाले. त्याच वेळी  शेतक-यांनी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना माहिती दिली. कामगार सेलू रेल्वे स्टेशनवर पोहचतात पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. पटरीने जवळपास ४५ किमी अंतर पायी कापल्याने कामगारांना थकवा जाणवत  होता. पोलीसांनी त्यांना   बिस्किटे दिली. सर्व १४ कामगारांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यांना भांगडिया वस्तीगृहात ठेवणार 

बेघर लोकांसाठी प्रशासनाने नूतन महाविद्यालयाच्या  श्रीरामजी भांगडिया वस्तीगृहात व्यवस्था केली आहे. यापूवीर्ही ११ व्यक्तींना त्या ठिकाणी ठेवले आहे. या १४ कामगारांनाही याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. शहरातील काही दानशूर व्यक्तींनी दोन वेळा जेवण आणि चहा फराळाची व्यवस्था वस्तीगृहात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी