शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही कोरोनाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १६ एप्रिल २०२० रोजी परभणीतील एमआयडीसी भागात आढळला होता. त्यानंतरही गेल्या वर्षभरात कोरोनाचे ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १६ एप्रिल २०२० रोजी परभणीतील एमआयडीसी भागात आढळला होता. त्यानंतरही गेल्या वर्षभरात कोरोनाचे संकट जिल्ह्यावर कायम असले तरी या संदर्भात पूर्वी कोरोनाबाबत वाटणारी काळजी आता मात्र नागरिकांमध्ये तेवढ्या तीव्रतेने दिसत नाही. परिणामी संचारबंदी असतानाही बिनदिक्कतपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात कमी झालेली नाही.

गतवर्षी देशात पहिला कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये ३०डिसेंबर रोजी सापडला होता. त्यानंतर हळूहळू देशातील रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर २२ मार्च २०२० पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. १६ एप्रिल २०२० रोजी पुणे येथून हिंगोलीकडे जाणारा तरुण परभणी शहरातील एमआयडीसी भागात नातेवाइकांकडे आला व त्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हा जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला. त्यानंतर जूनपर्यंत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. नंतरच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. दिवाळीपूर्वी ही संख्या घटली. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत झाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून नागरिकांची सुटका झाली, असे वाटत असतानाच फेब्रुवारीच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या वाढत गेली. मार्च महिन्यात तब्बल ६ हजार २८१ रुग्णांची वाढ झाली; तर ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर १ ते १६ एप्रिल या १६ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९ हजार ७८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती यानिमित्ताने समोर आली आहे. यावर मात करण्याच्या अनुषंगाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. असे असताना नागरिक मात्र याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत. परिणामी संचारबंदीचे उल्लंघन करून सर्रासपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ११.५ टक्के

आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरात १५ एप्रिलपर्यंत २ लाख ४ हजार ८३३ नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी केली. त्यामध्ये १ लाख १६ हजार ६८७ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात १२ हजार ८८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे १०.१७ टक्के प्रमाण आहे; तर ७८ हजार १४६ जणांची ॲंटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १० हजार ६२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याचप्रमाणे १३.५९ टक्के आहे. जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत केलेल्या २ लाख ४ हजार ८३३ तपासण्यांमध्ये २३ हजार ५०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. याचे प्रमाण ११.४८ टक्के आहे.

मृत्युदर २.५१ टक्के

जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ५९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये परभणी शहरातील २८७, तर ग्रामीण भागातील ३०४ जणांचा समावेश आहे. आढळून आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा दर २.५१ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.३६ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्युदर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.