शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

वाळूअभावी १५० घरकुलांचे बांधकाम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST

नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह ...

नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह इतर भागांत राहत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास १५० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. घरकुलाचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्याने लाभार्थांनी घरकुल बांधकामाला सुरुवात केली. मात्र वाळू मिळत नसल्याने या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे. वाळू माफिया वाळूची चोरी करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. यामध्ये तीन ब्रास क्षमता असलेले वाहन २२ हजार रुपयाला जात आहे. पाच ब्रास वाळू क्षमता असलेले हायवा हे वाहन ४५ हजार रुपयाला विक्री केले जात आहे. अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करून वाळूमाफिया मलिदा लाटत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. वाळूचे हे दर सामान्य घरकुल लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते खरेदी करू शकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिन्यापासून या घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहे. काही लाभार्थ्यांना दुसरीकडे राहण्याचा ठिकाण नसल्याने उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. दुसरीकडे शासनाने घरकुल लाभार्थ्यासाठी पाच ब्रास वाळूची सोय केली आहे. याबाबतीत शासनाने रीतसर परिपत्रक काढले असतानाही ही मोफत वाळू मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. मात्र प्रशासनाकडून लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

वाळू घाट आरक्षित करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयाने वाळू घाटांची नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली असून, तालुक्यातील वांगी येथील वाळू घाट यावेळी पाथरी येथील ठेकेदाराला सुटला आहे. आठवडाभरात येथील वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून घाटाचे लिलाव झाले नसल्याने यामुळे या वेळेस वाळूची मागणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. वाळूच्या दराबाबत ही बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चिंता लागली आहे. घरकुल लाभार्थ्यांना मिळणारा निधी आणि वाळूचे दर पाहता लाभार्थ्यांना हे परवडणार नसल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून रमाई घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध व्हावी यासाठी तालुक्यातील गोदावरी नदीवरील एखादा वाळू घाट आरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.