शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाळूअभावी १५० घरकुलांचे बांधकाम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST

नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह ...

नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह इतर भागांत राहत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास १५० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. घरकुलाचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्याने लाभार्थांनी घरकुल बांधकामाला सुरुवात केली. मात्र वाळू मिळत नसल्याने या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे. वाळू माफिया वाळूची चोरी करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. यामध्ये तीन ब्रास क्षमता असलेले वाहन २२ हजार रुपयाला जात आहे. पाच ब्रास वाळू क्षमता असलेले हायवा हे वाहन ४५ हजार रुपयाला विक्री केले जात आहे. अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करून वाळूमाफिया मलिदा लाटत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. वाळूचे हे दर सामान्य घरकुल लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते खरेदी करू शकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिन्यापासून या घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहे. काही लाभार्थ्यांना दुसरीकडे राहण्याचा ठिकाण नसल्याने उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. दुसरीकडे शासनाने घरकुल लाभार्थ्यासाठी पाच ब्रास वाळूची सोय केली आहे. याबाबतीत शासनाने रीतसर परिपत्रक काढले असतानाही ही मोफत वाळू मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. मात्र प्रशासनाकडून लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

वाळू घाट आरक्षित करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयाने वाळू घाटांची नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली असून, तालुक्यातील वांगी येथील वाळू घाट यावेळी पाथरी येथील ठेकेदाराला सुटला आहे. आठवडाभरात येथील वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून घाटाचे लिलाव झाले नसल्याने यामुळे या वेळेस वाळूची मागणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. वाळूच्या दराबाबत ही बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चिंता लागली आहे. घरकुल लाभार्थ्यांना मिळणारा निधी आणि वाळूचे दर पाहता लाभार्थ्यांना हे परवडणार नसल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून रमाई घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध व्हावी यासाठी तालुक्यातील गोदावरी नदीवरील एखादा वाळू घाट आरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.