शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

२०५ मागासवर्गीय सदस्यांना प्रमाणपत्रांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:17 IST

देवगावफाटा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सेलू तालुक्यातील २०५ उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. ...

देवगावफाटा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सेलू तालुक्यातील २०५ उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या नूतन सदस्यांना प्रमाणपत्रांची चिंता लागली आहे.

सेलू तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत ५१९ पैकी ५१७ जागांवरील उमेदवार विजयी झाले. दोन जागा रिक्त आहेत. विजयी ५१७ उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ६८, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ व इतर मागास प्रवर्गातील १३६ उमेदवारांचा समावेश आहे. १८ जानेवारी रोजी निवडणुकांचा निकाल घोषित झाला. त्यानंतर आठवडाभरात राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांची यादी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यवाहीसाठी तालुका प्रशासनाकडून सादर करणे अपेक्षित होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जवळपास दोन महिने झाले तरी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्रस्ताव सादर केलेला नाही. निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेस वेळ लागतो. त्यामुळे एक वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र मिळवून ते निवडणूक विभागाला सादर करण्याची चिंता नूतन सदस्यांना लागली आहे. त्यामुळे हे सदस्य प्रस्ताव दाखल केल्याची पोहोच पावती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे घेऊन चकरा मारत आहेत. परंतु, त्यांना सेलू येथील निवडणूक विभागाकडून अशी कोणतीही यादी आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी हे नूतन सदस्य या कार्यालयाचे उंबरठे झिझवतांना दिसून येत आहेत. या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी निवडणूक विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

३० उमेदवारांची सरपंचपदी निवड

मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर तालुक्यात एकूण २०५ उमेदवार निवडून आले आहेत. त्यातील ३० उमेदवारांची संबंधित गावच्या सरपंचपदी वर्णी लागली आहे. असे असले तरी त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध नाही. त्यामुळे लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळवून आपले सरपंचपद अबाधित ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. परंतु, निवडणूक विभागाकडूनच सूत्र हालत नसल्याने या सरपंचांना प्रमाणपत्रांची चिंता सतावत आहे.