शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:14 IST

परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

CM Devendra Fandavis on Parbhani Violence :परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या बंदला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे दुपारनंतर शहरात जमावबंदी लागू करावी लागली. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. तसेच जाळपोळ केल्याचेही समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर हिंसा करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

परभणीत दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली होती. त्यानंतर या माथेफिरुला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र बुधवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे आता शांतता असल्याचे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून बोलत होते.

"परभणीत संविधानाच्या प्रतिमेसोबत माथेफिरुनी केलेल्या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथेफिरू आहे. तो एक प्रकारचा मनोरुग्ण आहे. त्याला लगेच अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होते हे काही योग्य नाही. जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्कारला पाहिजे. अटक झाल्यानंतर हिंसा करणे हे काही योग्य नाही. तिथे आता शांतता आहे. भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

परभणीत उद्रेक

बुधवारी परभणी येथे काळी कमान खानापूर फाटा याशिवाय कॅनॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबेडकरी चळवळीतील समर्थकांनी टायर जाळून आंदोलनास सुरुवात केली होती. परभणी शहर बंदची हाक दिल्याने आज शहरातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.  विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.

दुसरीकडे, महिलांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून खिडक्यांची तावदाने, खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच शहरात काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली.

टॅग्स :parabhaniपरभणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParbhani policeपरभणी पोलीस