शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

शहीदांच्या स्मृती जागविणारा चौक

By admin | Updated: August 9, 2014 00:29 IST

परभणी: शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला

परभणी: शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या क्रांती चौकात शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण देतानाच नव्या पिढीला स्फुर्ती मिळत आहे.मराठवाडा मुक्ती संग्रामात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेकांनी कारावास भोगला. अनेकांनी भूमिगत राहून लढा दिला. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. आर. बी. देशपांडे, मुकुंदराव पेडगावकर, मनोहरराव खेडकर, श्रीनिवासराव बोरीकर, गोविंदराव नानल अशी किती तरी नावे घेता येतील ज्यांनी या लढ्यासाठी आपले सर्वस्व दिले. शहरातील क्रांती चौकातूनच या स्वातंत्र्य सैनिकांची रणनीती ठरायची. याच ठिकाणी योजना आखल्या जायच्या. विशेष म्हणजे याच चौकात बैठका झाल्या आणि याच चौकातून अनेकांना कारावासही भोगावा लागला. माजी आ. आर. बी. देशपांडे यांना येथूनच कारावासात जावे लागले होते. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात क्रांती चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आठवणी जागृत ठेवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, अण्णासाहेब गव्हाणे यांच्या उपस्थितीत १९७६ मध्ये या ठिकाणी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला. भाजी मार्केट परिसरात हा स्मृती स्तंभ असल्याने परिसर अस्वच्छ बनला होता. स्तंभाशेजारीच विक्रेते त्यांचे साहित्य ठेवत. त्यामुळे या स्मृती स्तंभाची अवहेलनाच होत होती. हा स्मृती स्तंभ म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलीदानाची आठवण करुन देणारा, क्रांतीच्या स्मृती तेवत ठेवणारा स्तंभ आहे. परंतु त्याच स्तंभाची दुरवस्था होत असल्याने येथील बालनाथ देशपांडे यांनी या चौकाचे आणि स्मृतीस्तंभाचे वैभव जपले जावे यासाठी एकाकी लढा दिला. शासन दरबारी या स्तंभाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुंबई येथील आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करुनही त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे बालनाथ देशपांडे यांनी स्तंभाच्या ठिकाणीच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणही सुरू केले. त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दखल या ठिकाणी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आले. सध्या हा स्मृती स्तंभ आणि चौकाचे सुशोभिकरण झाले असून, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम या स्तंभाच्या माध्यमातून होत आहे.