शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडीने मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 18:50 IST

Marathwada water grid scheme : जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ. भागवत कराड बोलत होते.

ठळक मुद्देमराठवाड्याचा मानवी निर्देशांक अत्यंत कमी आहे.अनुशेष भरण्यासाठी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड काम करीत होते.

जिंतूर (परभणी ) : ४० हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाच्या खाईत लोटले असून, हे पाप करणाऱ्या राज्य सरकारला नागरिक माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड ( Bhagwat Karad) यांनी केले.

जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ.कराड बोलत होते. व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, यात्रेचे प्रमुख मनोज पांगरकर, प्रवीण घुगे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार मोहन फड, विठ्ठलराव रबदडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, हर्षवर्धन कराड, रजनी पाटील, सुरेश भुमरे, रामराव वडकुते, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - मंत्रीच ४ तास थांबले कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत; नंतर पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी

आ.मेघना बोर्डीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ.बोर्डीकर यांनी मतदार संघातील राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणावर टीका करत वेगवेगळ्या योजने अंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मतदार संघात राष्ट्रीयकृत बँकांच्या वाढीव शाखा सुरू करण्याची मागणी केली. हिंगोली जिल्ह्यात हलविलेले आयकर कार्यालय परत परभणीत आणावे, अशी मागणी केली.

डॉ.भागवत कराड म्हणाले, ३७० कलम, सर्जिकल स्ट्राइक यासह अनेक देशहिताचे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी मागील काळात भाजपा सरकारने चाळीस हजार कोटी रुपये खर्चून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली. परंतु आघाडी सरकारने ही योजना रद्द करून मराठवाड्यातील जनतेला पुन्हा एकदा दुष्काळाच्या खाईत ढकलले आहे. मराठवाड्याचा मानवी निर्देशांक अत्यंत कमी आहे. शिक्षण, रस्ते अनुशेष भरण्यासाठी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड काम करीत होते. राज्य शासनाने हे बोर्ड पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्राला शिफारस शिफारस करावी, अशी विनंती वारंवार करुनही आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे. परिणामी विकास विकासापासून मराठवाडा दूर राहत आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतBJPभाजपाMarathwadaमराठवाडाparabhaniपरभणी