शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडीने मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 18:50 IST

Marathwada water grid scheme : जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ. भागवत कराड बोलत होते.

ठळक मुद्देमराठवाड्याचा मानवी निर्देशांक अत्यंत कमी आहे.अनुशेष भरण्यासाठी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड काम करीत होते.

जिंतूर (परभणी ) : ४० हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाच्या खाईत लोटले असून, हे पाप करणाऱ्या राज्य सरकारला नागरिक माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड ( Bhagwat Karad) यांनी केले.

जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ.कराड बोलत होते. व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, यात्रेचे प्रमुख मनोज पांगरकर, प्रवीण घुगे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार मोहन फड, विठ्ठलराव रबदडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, हर्षवर्धन कराड, रजनी पाटील, सुरेश भुमरे, रामराव वडकुते, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - मंत्रीच ४ तास थांबले कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत; नंतर पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी

आ.मेघना बोर्डीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ.बोर्डीकर यांनी मतदार संघातील राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणावर टीका करत वेगवेगळ्या योजने अंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मतदार संघात राष्ट्रीयकृत बँकांच्या वाढीव शाखा सुरू करण्याची मागणी केली. हिंगोली जिल्ह्यात हलविलेले आयकर कार्यालय परत परभणीत आणावे, अशी मागणी केली.

डॉ.भागवत कराड म्हणाले, ३७० कलम, सर्जिकल स्ट्राइक यासह अनेक देशहिताचे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी मागील काळात भाजपा सरकारने चाळीस हजार कोटी रुपये खर्चून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली. परंतु आघाडी सरकारने ही योजना रद्द करून मराठवाड्यातील जनतेला पुन्हा एकदा दुष्काळाच्या खाईत ढकलले आहे. मराठवाड्याचा मानवी निर्देशांक अत्यंत कमी आहे. शिक्षण, रस्ते अनुशेष भरण्यासाठी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड काम करीत होते. राज्य शासनाने हे बोर्ड पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्राला शिफारस शिफारस करावी, अशी विनंती वारंवार करुनही आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे. परिणामी विकास विकासापासून मराठवाडा दूर राहत आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतBJPभाजपाMarathwadaमराठवाडाparabhaniपरभणी