शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडीने मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 18:50 IST

Marathwada water grid scheme : जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ. भागवत कराड बोलत होते.

ठळक मुद्देमराठवाड्याचा मानवी निर्देशांक अत्यंत कमी आहे.अनुशेष भरण्यासाठी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड काम करीत होते.

जिंतूर (परभणी ) : ४० हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाच्या खाईत लोटले असून, हे पाप करणाऱ्या राज्य सरकारला नागरिक माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड ( Bhagwat Karad) यांनी केले.

जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ.कराड बोलत होते. व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, यात्रेचे प्रमुख मनोज पांगरकर, प्रवीण घुगे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार मोहन फड, विठ्ठलराव रबदडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, हर्षवर्धन कराड, रजनी पाटील, सुरेश भुमरे, रामराव वडकुते, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - मंत्रीच ४ तास थांबले कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत; नंतर पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी

आ.मेघना बोर्डीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ.बोर्डीकर यांनी मतदार संघातील राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणावर टीका करत वेगवेगळ्या योजने अंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मतदार संघात राष्ट्रीयकृत बँकांच्या वाढीव शाखा सुरू करण्याची मागणी केली. हिंगोली जिल्ह्यात हलविलेले आयकर कार्यालय परत परभणीत आणावे, अशी मागणी केली.

डॉ.भागवत कराड म्हणाले, ३७० कलम, सर्जिकल स्ट्राइक यासह अनेक देशहिताचे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी मागील काळात भाजपा सरकारने चाळीस हजार कोटी रुपये खर्चून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली. परंतु आघाडी सरकारने ही योजना रद्द करून मराठवाड्यातील जनतेला पुन्हा एकदा दुष्काळाच्या खाईत ढकलले आहे. मराठवाड्याचा मानवी निर्देशांक अत्यंत कमी आहे. शिक्षण, रस्ते अनुशेष भरण्यासाठी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्ड काम करीत होते. राज्य शासनाने हे बोर्ड पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्राला शिफारस शिफारस करावी, अशी विनंती वारंवार करुनही आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे. परिणामी विकास विकासापासून मराठवाडा दूर राहत आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतBJPभाजपाMarathwadaमराठवाडाparabhaniपरभणी